Your cart is empty now.
सन 1857 ते 1950 या कालखंडातील भारताचा इतिहास हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीबरोबरच सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळी आणि अनेक घटकांच्या अस्तित्वाच्या जागृतीचा, प्रतिउत्तराने व्यापलेला इतिहास आहे. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा प्रारंभ होऊन विविध धार्मिक सामाजिक चळवळीत विविध संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या आत्मभानातून स्वदेशी चळवळीने राजकिय, आर्थिक भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या लढ्यात सशस्त्र क्रांतीकारी आंदोलनाची लाट ब्रिटीशांच्या धोरणास प्रतिउत्तर देण्यास उदयास आली. इंडियन नॅशनल आर्मीच्या लढ्याने ब्रिटीश प्रशासनास हादरा बसला. भारताच्या इतिहासात अतिजहाल सांप्रदायिकतेची विचार प्रणाली उदयास आली. त्यामुळे मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका इतिहासात नोंद करुन गेली. फाळणीच्या दु:खाबरोबरच भारतीयांना स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. त्या स्वातंत्र्यास अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नातील भारतीय संविधानाची निर्मिती इत्यादींचीही माहितीसोबतच याची जाणीवही विद्यार्थ्यांस व्हावी त्यासाठीच हे ग्रंथलेखन.