Your cart is empty now.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक घटकांचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळ निर्माण करण्याची पार्श्वभूमी अनेकांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. अनेक व्यक्ती आणि संस्था यांचे योगदान ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत झाले. या दृष्टीने एकोणिसावे शतक हे महत्त्वाचे मानतात. या शतकात भारतात सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्या. या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि बौद्धिक जागृती घडून आली.
सदरील पुस्तकात सामाजिक व धार्मिक चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक गट अंर्तप्रवाह, कामगार संघटना, प्रांतीय स्वायत्तता, जमातवादाचा उदय आणि विकास, स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी या सर्व घटकांची विस्तृत व सविस्तर माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे.c