Your cart is empty now.
वाढते औद्योगिकरण, बदलते तंत्रज्ञान सामाजिक आणि आर्थिक बदल याचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल व अर्धकुशल स्वरुपातील व्यवसाय शिक्षणाची आज गरज निर्माण झाली आहे. चीन देशाने माणसाची गरज लक्षात घेऊन त्या गरजोपयोगी वस्तूंची निर्मिती केली. त्यामुळे जगातील सर्वच बाजारपेठांत त्यांच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चीनचा हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून तसेच तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अशा विषयांचे प्रशिक्षण घेऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर यानिमित्ताने शासनाने ठेवले आहेत. आज केवळ पारंपरिक पुस्तकी शिक्षणच न घेता व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्याचा तरुणांनी विचार करणे आवश्यक आहे.