Your cart is empty now.
डिजीटल युग म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान विकासाची एक देणगी आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणार्या गतीशील वेगाने मानवी समाजजीवन ढवळून निघाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र अत्यंत जलदगतीने विस्तारीत आणि विकसीत होवून आयुष्याची ती मूलभूत गरज भासणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मोबाईल किंवा इंटरनेटशिवाय कोणतेही कार्य सहजतेने पार पडणे अशक्य होणार आहे.
डिजिटल युगातील युद्धाची कार्यवाही ‘नेट’शी संबंधित आहे आणि यापुढेही राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय प्रणालीद्वारे घडविलेली अचानक विध्वंसक कार्यवाही हाच सायबर युद्धाचा उद्देश्य आणि योजना असते. यामुळे सामाजिक, आर्थिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक वगैरे सर्वच स्तरावर गोंधळ माजून समाजाची अथवा देशाची घडीदेखील विस्कळीत होते. जागतिक क्षेत्रात दररोज कोठे न कोठे सायबर हल्ले, सायबर गुन्हे होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्ह्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.