Your cart is empty now.
जगातील तसेच भारतातील पहिली सभ्यता म्हणुन आदिवासी भिल्लांचा उल्लेख करावा लागेल. तडवी हे भिल्लांचे वंशज आहेत. आदिवासी तडवींची मातृभाषा ही ‘तडवी’ म्हणुन ओळखली जाते. आदिवासी बोलीभाषा या मुक्त, नैसर्गिक स्वभाव गुणसंपन्न असतात. त्यांच्यात एक प्रकारची सहजता दिसते. आदिवासी तडवी भाषा ही नैसर्गिकपणे ध्वनी, उच्चार, गोडवा, सहजता, ताल, लय, माधुरता या गुणांमुळे हजारो वर्षांपासून फक्त मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत व सहजच चालत आलेली आहे. काळाच्या ओघात ती लोप पावली नाही. आदिवासी जमातीच्या रूढी, परंपरा, चालीरिती, चालचलन, जीवन व्यवहार, रीतीरिवाज, खानपान, सांस्कृतिक, सामाजिक, जीवन पद्धती, वाङ्मय, लोककथा, साहित्य संपदा या बाबी मौखिक स्वरूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत होत आलेल्या आहेत. तडवी लिपीच्या वापराने अख्खी विश्वजात, विश्वसाहित्य, विश्वलोकवाङ्मय व विश्वलोकाभिमुखता सामावून घेण्याची ताकद निश्चितच आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये.