Your cart is empty now.
आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.