Your cart is empty now.
इ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.