Your cart is empty now.
साहित्य नेहमीच माणसाला सहाय्य करीत आलेलं आहे. तेच त्याच्यासाठी आशेचं, साहसाचं आणि शौर्याचं प्रेरणास्त्रोत बनून राहिलं आहे. भल्याबुर्याच ज्ञान त्याने साहित्याद्वारेच मिळवलं आहे. वरवर पाहिलं तर असं वाटेल, की साहित्यिक केवळ माणसाच्या दैहिक दुःखाचं आणि त्याच्या हर्षोल्हासाचं चित्रण करतोः पण वास्तवात त्याच्या प्राणात वसत असलेल्या दीपशिखेला चेतवणं हा त्याचा उद्देश असतो. काळाबरोबर जीवनाची मूल्यंही बदलतात. त्या परिवर्तनाचं स्वागत करणं हे साहित्याचं कर्तव्य आहे आणि युगाप्रमाणे जीवनमूल्यांची स्थापना करणं हेही साहित्याचं कर्तव्य आहे.
– वि. स. खांडेकर