Your cart is empty now.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकीय विचारवंत’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजकीय विचारवंतांच्या विचारांमुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनेत अनेक फेरबदल होऊन आलेले आहेत. राजकीय विचारवंतांच्या तत्वज्ञानात शासनकर्त्यांची भूमिका, दृष्टीकोन, तसेच सामाजिक आर्थिक राजकीय समस्यांविषयी त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट येतो. राजकीय विचारवंतांचे विचार समाजाचा व राज्याचा विकास समजून घेण्यासाठी दृष्टीकोन महत्वपुर्ण असतात. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात महात्मा बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, डॉ. बी. आर. आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू या भारतीय राजकीय विचारवंतांच्या विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात या सर्व राजकीय विचारवंतांच्या विचारांचे सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.