Your cart is empty now.
देशाचे संरक्षण आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी जशी सैन्यदलाची गरज असते. त्याचप्रमाणे सैन्याला दिशा देण्यासाठी संघटनेची गरज असते आणि ही संघटना उत्तम अशा प्रशासनाचा मूलभूत स्वरूपाचा पाया समजला जातो. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे पद देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे आणि अंतर्गत कलहापासून राष्ट्रहित जोपासणे ही तिन्ही सेनादलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल या तिघांचीही भूमिका स्वागतार्ह अशी आहे. यातील एकाही दलाचा निर्णय चुकल्यास राष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागते. कुशलता आणि चातुर्य लाभलेल्या संरक्षक घटकास चांगल्या प्रकारे प्रशिक्षणही प्राप्त झालेले असते. भारताच्या तिन्ही दलांमध्ये चांगल्या लष्करी संघटनेसाठी उद्देश, सहकार्य, लवचिकता, समतोलपणा, काटकसर, विकेंद्रीकरण, प्रयत्नाची एकता आणि अचूकपणा या तत्त्व समरसून भरलेले आहे असल्यामुळे आज तिन्ही दले भारताची मान जगात उंचावताना दिसून येते. सावध भूमिका घेतानाच वेळप्रसंगी आक्रमकपणाचेही दर्शन तिन्ही दलांनी विविध प्रसंगी घेतलेल्या भूमिकांवरून दिसून येते.