Your cart is empty now.
जग बदलत्या काळात अनुकूल राहणे अत्यंत आवश्यक झाले आहे. म्हणूनच अभ्यासक्रमात वेळोवेळी केले जाणारे बदल हे शैक्षणिक प्रगतीचे नैसर्गिक लक्षण आहे. एखादा विषय जेव्हा नव्या पद्धतीने आणि विविध अंगांनी शिकवला जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानाची वाढ होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करताना वाणिज्य शाखेच्या एम.कॉम. द्वितीय सत्रासाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणला आहे. या हेतूने, विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले "सामग्री व्यवस्थापन" हे पाठ्यपुस्तक सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक स्वयं-अभ्यासासाठी उपयुक्त असून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सोप्या भाषेत रचले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची सर्वोत्तम तयारी करता येते.