• मराठ्यांचा इतिहास

    सतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी एकत्र करून त्यांच्यापुढे स्वराज्याची कल्पना मांडली. जे मराठा सरदार प्रारंभी या कल्पनेच्या विरोधात होते, त्यांना त्यांनी पराजित करून धडा शिकविला. अफजलखान, शाहिस्तेखान यासारख्या प्रतिष्ठीत सरदारांना पराभूत केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठ्यांच्या सत्तेचा हिंदुस्तानात लौकिक पसरला.

    395.00
    Add to cart
  • मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818)

    सतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. पेशव्यांमध्ये बाजीराव पहिला याने मोगली सत्तेचा पाडाव केला. मराठ्यांची सत्ता संपूर्ण हिंदुस्थानभर पसरली. पानिपत लढाईच्या घनघोर संग्रामानंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.

    Marathyancha Etihas

    395.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील किल्ले सांस्कृतिक योगदान

    कोणताही समाज हा साहित्यावर टिकतो, तो केवळ पूजा-पाठ आणि कर्मकांड यांच्यावर टिकत नसतो. साहित्य हा समाजाचा मूळ पाया असतो. तो दृढ करण्याचे महत्वाचे कार्य मध्ययुगीन काळात दुर्गांनी केले. हेमाद्रिचा चर्तुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ दौलताबादच्या किल्ल्यात लिहिला गेला. जैनांचा पहिला ज्ञानकोश याच दुर्गावर कलानिधी वैद्यनाथ यांनी तयार केला. इ.स.1493 च्या सुमारास जैन महाकवी जिनदास आणि पुण्यसागर यांनी हरिवंश पुराणाची रचना केली. हा ग्रंथ 67 अध्यायांचा असून त्यात अकरा हजार ओव्या आहेत. या ग्रंथातून जैन परंपरेत श्रीकृष्णाची असलेली व्यक्तीरेखा महाराष्ट्राला समजू शकेल. केशव याने वैद्यकशास्त्रावर तर त्याचा पुत्र बोपदेव याने व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यावर तीन, भागवत तत्त्व विशद करण्यासाठी तीन आणि तिथी निर्णयावर एक इतक्या ग्रंथ रचना स्वत: केल्या. बागलाणची राजधानी मुल्हेर किल्ल्यावर इ.स.1610 मध्ये कवी मधुकर याने कथा कल्पतरू हा ग्रंथ पूर्ण केला. तो मुल्हेरचा उल्लेख वाटिकानगर, मयुराचल असा करतो. त्याच्या ग्रंथातून तत्कालिन बागलाणच्या राजाच्या व मुल्हेर किल्ल्याच्या वैभवाची व समृद्धीची कल्पना येते. पन्हाळा येथे पंडित रामचंद्र अमात्य यांनी मराठा राजनीतीवरील आपला प्रसिद्ध ग्रंथ आज्ञापत्र हा लिहिला. लोकमान्य टिळकांनी सिंहगडावर आर्क्टिक होम इन द वेदाज आणि गीतारहस्य या दोन प्रसिद्ध ग्रंथांच्या मुद्रण प्रती येथेच तयार केल्या. गोपाल नायक, शारंगदेव, कवी नरेंद्र यांच्या कला दुर्गातच विकसित झाल्या म्हणून दुर्ग हे साहित्य आणि कलेचे सृजनदाते होते असे म्हटले पाहिजे.

    Maharashtratil Kille Ani Sanskrutik Yogdan

    395.00
    Add to cart
  • मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)

    जहिरूद्दीन मोहम्मद बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ रोजी दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करुन भारतात मोगल राजघराण्याची सत्ता स्थापन केली. हे राज्य इ.स. १७०७ पर्यंत प्रभावी होते. तर इ.स. १७०७ पासून १८५७ पर्यंत नामधारी होते. या काळात दिल्ली ही राज्याची राजधानी होती. मोगल घराण्यात जहिरूद्दीन बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती आणि प्रशासन, कला व वास्तुकलेचा आढाव घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.

    Mogalkalin Bhartacha Ithihas (1526 te 1707)

    375.00
    Add to cart
  • राजर्षी शाहू महाराजांची निवडक 16 भाषणे

    ‌‘राजर्षी शाहू महाराजांची निवडक 16 भाषणे’ या पुस्तकाचे संपादक डॉ. अनंता सूर यांचे सधन्यवाद अभिनंदन करतो. नवे अभ्यासक अध्यापक फुले- शाहू-आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची आणि क्रांतिकार्याची आपल्या बौद्धिक जीवनाच्या केंद्रस्थानी आदरपूर्वक प्रस्थापना करीत आहेत याचा मला विशेष आनंद वाटतो. कारण या त्रिसरणाचा प्रकाशदंड सकलांच्या समान ऐहिक हितसंबंधांचाच मूल्यदंड आहे. या प्रक्रियेचे क्षितिज विस्तारले तर महाराष्ट्रात आज आवश्यक त्या क्रांतिकारी ज्ञानसंस्कृतीचा प्रकर्ष होऊ शकतो.
    राजर्षी शाहू महाराजांनी समान मानवी सन्मानासाठी अन्यायी ब्राह्मणी व्यवस्थेशी निकराचा संघर्ष केला. ही शाहू महाराजांची भूमिका पूर्णतः व्यवस्थाबदलाचीच आहे. परंपरादासांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी मानवाधिकारांची पायाभूत लढाई सुरू केली. शिक्षण, आरक्षण ही त्यांची कार्ये सर्वमानवसमभावी आहेतच पण ‌‘जातिभेद मोडून आपण सर्व एक होऊ’ ही त्यांची भूमिका आमूलाग्र क्रांतीची प्रकाशवाट निर्माण करणारीच आहे. सर्वांच्या समान मानवी प्रतिष्ठेची महत्ता त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायानेच पटवून दिली.
    शाहू महाराजांच्या भाषणांनी वंचित लोकांना समान मानवाधिकारांसाठी लढायला शिकविले. त्यांच्या चळवळीमधून उगवलेली लोकशाही भेदातीत माणसांचा सिद्धान्त झाली. डॉ. अनंता सूर यांचे हे संपादन वाचकांच्या मनात शाहू महाराजांची भेदातीत लोकशाही प्रखर करील ही खात्री मला आहे.

    Rajarshri Shahu Maharajanchi Nivadak 16 Bhashane

    160.00
    Add to cart
  • विसाव्या शतकातील जगाचा इतिहास (1942 ते 1992)

    Visavya Shatakatil Jagacha Itihas (1942 te 1992)

    295.00
    Add to cart
  • शिवकालीन महाराष्ट्र

    Shivakalin Maharashtra

    260.00
    Add to cart
  • शिवशाहीच्या पाऊलखुणा

    Shivshahichya Paulkhuna

    150.00
    Add to cart
  • समकालीन भारताचा इतिहास (1947 – 1990)

    “…बऱ्याच वर्षांपूर्वी आपण नियतीशी-भवितव्याशी संकेत केला होता; आणि आज आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा क्षण आला आहे. आपण आपली प्रतिज्ञा पूर्णांशाने पुरी केलेली नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती पुरी केली आहे. आता मध्यरात्रीचा ठोका जेव्हा पडेल, जेव्हा सारे जग निद्राधीन झालेले असेल; तेव्हा भारतात चैतन्याची आणि स्वातंत्र्याची जाग येईल. इतिहासात असा क्षण क्वचित येतो की ज्यावेळी आपण जुन्या मावळत्या युगातून नव्या युगात प्रवेश करतो जुन्या युगाचा शेवट होतो आणि दीर्घकाळ दडपल्या गेलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. अशा या गंभीर आणि पवित्र प्रसंगी आपण भारताच्या, भारतीय जनतेच्या, एवढेच नव्हे तर अधिक व्यापक आशा मानव जातीच्या सेवेला वाहून घेण्याची प्रतिज्ञा करतो आहोत हे या प्रसंगाला उचित असेच आहे…”

    – पंडित जवाहरलाल नेहरू

    310.00
    Add to cart
  • समकालीन भारताची निर्मिती (1950-2019)

    15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला राजकिय स्वातंत्र्य मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या युक्तीवादाने अनेक लहान मोठ्या संस्थानिकांचे मन वळवून भारतीय संघराज्यात समाविष्ट करून घेतले. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू झाली. शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, आण्विक व अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती कौतुकास्पद आहेच; पण दुसरीकडे स्वातंत्र्योत्तर भारतातही आदिवासी-दलित आणि स्त्रियांच्या विविध चळवळी व संघर्ष झाले. जमातवाद, प्रादेशिकवाद व नक्षलवाद या गंभीर समस्यांनी आज अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आपणास दिसते.
    सदर पुस्तकात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, राज्यघटना निर्मितीपासून तर देशातील या काळात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय व आर्थिक घडामोडींचा, भारतीयांचे मन अस्वस्थ करणार्‍या घटनांचा, समाजातील बदललेल्या विविध घटकांचा, इ.स. 1991 नंतरच्या आर्थिक धोरणाच्या परिणामांचा, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीचा तसेच देशासमोर उभ्या ठाकलेल्या विविध मुख्य आव्हानांचा आढावा घेतलेला आहे. ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या केलेली आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व विविध स्पर्धा परिक्षार्थी मित्रांना, अशा सर्वांनाच उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

    Samkalin Bharatachi Nirmiti (1950-2019)

    475.00
    Add to cart
  • साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील सांस्कृतिक जीवन

    प्रस्तुत ग्रंथाद्वारे साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील सांस्कृतिक जीवनावर नव्याने प्रकाश टाकलेला दिसून येतो. साताऱ्याच्या छत्रपतींचा राजदरबारातील सांस्कृतिक जीवनाचे विविध पैलू वाचकासमोर मांडलेले दिसून येतात. साताऱ्याच्या छत्रपतीनी (राजांनी) त्यांच्या दरबारात अनेक कलाकार, खेळाडु, सेवक व वैद्यक लोकांना राजाश्रय देवून आपल्या दरबाराचे महत्त्व वाढविले होते यात शंकाच नाही. त्यांच्या दरबारातील रितीरिवाज, करमणुकीचे कार्यक्रम, इतर चालीरिती, तत्कालीन सण आणि उत्सव, राजदरबारात साजरे होणारे धार्मिक विधी आणि राजदरबारातील वेगवेगळे विभाग यांचाही शोधपूर्ण आढावा घेतलेला दिसून येतो. ग्रंथात केलेले वर्णन अतिशय वास्तववादी स्वरुपाचे असून ते आजच्या काळातील महाराष्ट्रातील धार्मिक विधी व उत्सवांच्या वर्णनाशी बरेचसे जुळते मिळते आहे. त्यामुळे सदरील संशोधनात्मक ग्रंथ आजही महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी निगडीत असल्यासारखा वाटतो. साताऱ्याच्या राजदरबाराच्या सांस्कृतिक जीवनात तत्कालीन मराठा स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. हे तत्कालीन साधन ग्रंथाच्या पुराव्यावरुन म्हणता येईल. मराठ्यांच्या सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक ग्रंथापैकी हा एक अतिशय मौल्यवान ग्रंथ असून या ग्रंथाव्दारे मराठ्यांच्या इतिहासात नव्याने भर पडेल यात शंका नाही.

    Sataryachya Chhatrapatinchya Rajadarbaratil Sanskrutik Jeevan

    150.00
    Add to cart
  • स्वर्णिम भारत

    Swarnim Bharat

    375.00
    Add to cart
  • स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर आदिवासी जिल्हा : नंदुरबार

    देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असहकार चळवळ 1920, जंगल सत्याग्रह 1930, नंदुरबार येथे गोळीबार, चलेजाव आंदोलनातील बॉम्ब स्फोट, आदिवासी भागात चळवळीचे लोण, नंदुबार जिल्ह्यातील शिक्षा भोगलेले देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेल्या शिलालेखातील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या नावांची यादी इ. मुद्द्यांच्या सहाय्याने स्वातंत्र्य लढ्यातील नंदुरबार जिल्ह्याचे योगदान रेखांकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील कित्येक जिल्हे, तालुके, गावे असे आहेत की ज्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अजून देखील सर्व सामान्य वाचकांपर्यंत आलेले नाही. आदिवासी बहूल म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्हा हा त्यापैकीच एक आहे. पुस्तक वाचल्यानंतर हे सहज लक्षात येते की, सुप्रसिद्ध अशा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला नंदुरबार जिल्हा स्वातंत्र्य चळवळीत इतर जिल्ह्याप्रमाणे अग्रेसर राहिलेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ.टाटिया यांनी येथील बाल स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार व त्याच्या साथीदारांवर ब्रिटीशांनी केलेला गोळीबार, जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे रावला पाणी येथे ब्रिटिशांनी केलेला नरसंहार या प्रसंगांना वाचा फोडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो स्तुत्य, प्रशंसनीय व आदर्शवत असा आहे.

    – प्रा. सुनील कुलकर्णी
    संचालक, विद्यार्थी विकास विभाग,
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

    150.00
    Add to cart
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खानदेशची वाटचाल

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्य चळवळी संदर्भात तसेच या चळवळीतील खानदेशचे योगदान याखेरीज या खानदेश भूमीचे सर्वांगीण वैभव या गोष्टी वाचकांसमोर मांडाव्या या दृष्टीने विविध उपविषय आम्ही लेखकांना दिले होते. यापैकी बहुतांश उपविषय या ग्रंथातील लेखांच्या माध्यमातून साध्य झाल्याचे दिसते. खानदेशातील स्वातंत्र्याची चळवळ, खानदेशातील आदिवासी क्रांतिकारक, नवीन शैक्षणिक धोरण, खानदेशातील सण उत्सव परंपरा, खानदेशातील ग्रामीण साहित्य, खानदेशातील थोर पुरुष उदाहरणार्थ साने गुरुजी, कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे कार्यकर्तृत्व, खानदेशातील विशेषतः धुळे जिल्ह्याचा इतिहास, फारुकी राजवटीत खानदेशची राजधानी असलेल्या थाळनेर नगरीचा इतिहास, खानदेशातील मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान असे खानदेश केंद्री बहुसंख्य लेख या ग्रंथाचे सांस्कृतिक मूल्य वाढविणारे आहेत. स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेल्यानंतर खानदेश आज कुठे आहे? खानदेशाची सर्वांगीण प्रगती कशी झाली? या प्रगतीचे टप्पे कोणते? या वाटचालीचे निकष काय? या सर्वांचा उहापोह करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ग्रंथातील सर्व लेखकांनी केल्यामुळे हा ग्रंथ गैर शासकीय गॅझेट या मूल्याचा ठरला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात खानदेशी उद्योजकीय जगत कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे? उद्योगांच्या संदर्भात कोणकोणत्या उपक्षेत्रात वाव आहे याचीही चर्चा करणारे लेख या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. चोखंदळ, अभ्यासू व संशोधक दृष्टी बाळगणाऱ्या वाचकांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेशातल्या साहित्याचा, इतिहासाचा, वर्तमानातील घडामोडींचा परामर्श घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल, त्यांच्या अभ्यासासाठी, प्रस्तावित संशोधनासाठी या ग्रंथाची निश्चितच मदत होईल.

    Swatantyacha Amrut Mahotsav : Khandeshchi Vatchal

    325.00
    Add to cart
  • स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास (1947-1991)

    भारताला स्वातंत्र्य मिळाले पण ते अनेक समस्या घेऊन आले. भारताची फाळण्ाी झाली. हजारो निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. जाणारे कमी आणि येणारे जास्त. अन्नधान्याच्या दृष्टीने सुपीक प्रदेश पाकिस्तानमध्ये गेला. अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीची स्वीकारावी. याबाबत चर्चा होऊन मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारावी. दारिद्य्र, बेकारी, औद्योगिकीकरण, दळणवळण, ऊर्जा, बँकिंग व्यवसाय, कृषी जीवन यांत सुधारणा करणे आवश्यक होते. यांतून पंचवार्षिक योजनांचे नियोजन आले. ते बिघडविण्यासाठी आणि भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने भारताला युद्धाच्या खाईत लोटले. पंचवार्षिक योजनेचा तोल बिघडला. त्यांतून भारताने मार्ग काढून शांतता, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय मैत्री याचा स्वीकार केला. प्रारंभी परराष्ट्रीय धोरणात पंचशील तत्त्वांचा उद्घोष करून अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या काळात जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारून भारताने वाटचाल सुरू केली. या साऱ्या स्वातंत्र्योत्तर घटनांची गाथा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा ग्रंथ आहे.

    Swatantrottar Bharatacha Itihas (1947-1991)

    250.00
    Add to cart