-
-
-
-
आंतरराष्ट्रीय संबंध
आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन व स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचे होते. परंतु आज राज्याचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय शब्दाचा वापर अठराव्या शतकाच्या शेवटी जेरेमी बेथंमद्वारा केला गेला होता.
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात वेगवेगळ्या कालखंडात परिवर्तन झालेले आहे. आज विज्ञानयुगात दळणवळणाच्या साधनांत झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे राज्याराज्यातील अंतर कमी झाले आहे. तद्वतच आज राष्ट्रांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांना परस्परांवर अवलंबून राहावे लागते. प्राचीन काळातील राज्ये स्वावलंबी होती. परंतु आज ती परस्परावलंबी बनली आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. प्रत्येक राष्ट्र, राज्य हे सार्वभौम आहे. प्रत्येक राज्यसंबंधांवर राष्ट्र आपले धोरण ठरविण्यास स्वतंत्र आहे. अशा स्वतंत्र, सार्वभौम व सत्तासंपन्न राज्यांच्या आपसांतील संबंधास आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतात. सार्वभौम राज्ये आपले हित साध्य करीत असतांना परस्परांशी संघर्ष करतात. या संघर्षात सत्तेचा अधिक उपयोग केला जातो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाला सार्वभौम राज्यांच्या परस्परातील क्रिया व प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते.
वर्तमानकाळात शीतयुद्धाची व्यापकता, टेक्नॉलॉजीचा विकास, वरील वादांचे निर्मूलन, तसेच नवीन राष्ट्रांचा उदय इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय अध्ययनाचे क्षेत्र अधिकच व्यापक झाले आहे.Antarrashtriya Sandandh
-
आंतरराष्ट्रीय संबंध 2014 पासूनचे भारतीय परराष्ट्रीय धोरण
अलीकडच्या काळात म्हणजेच 20 व्या शतकात आंतरराष्ट्रीय संबंध हा महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून उदयास आलेला आहे. दळणवळणातील क्रांतीकारक बदलांमुळे जगाच्या विविध भागातील राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे; तसेच या बदलांमुळे राष्ट्रांतर्गत वेगवेगळे संबंध वाढीस लागले आहेत. त्यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे; वेगवेगळ्या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या स्वरूपात बदल घडून आलेले आहेत. आज आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात व्यापक बनलेले आहे. आज मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे तसेच दळणवळणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे राष्ट्राराष्ट्रातील अंतर कमी होऊन ती एकमेकांच्या अगदी जवळ आली आहेत. तसेच अलीकडच्या प्रत्येक राष्ट्रांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या गरजाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच मानवाने विनाशक स्वरूपाची शस्त्रास्त्रे निर्माण केल्यामुळे जागतिक परिस्थिती तणावाची बनून ती संरक्षणासाठी व इतर गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर अवलंबून राहू लागली. त्याच वेळी दुसरीकडे अशा तणावाच्या परिस्थितीमधून जगाला बाहेर काढण्यासाठी आणि जागतिक शांतता व सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या निर्मितीवर भर देण्यात आला. यातून आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूपाच्या कक्षा रूंदावलेल्या आपणास दिसून येतात.
Aantrastriya Sambandh 2014 Pasunche Bharatiya Parrashtriya Dhoran
-
आधुनिक जगाचा इतिहास (1453 – 2000)
अमेरिकन, फ्रेंच, औद्योगिक व रशियन क्रांतीला जगाच्या इतिहास महत्त्वपूर्ण स्थान आहे. अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेला यादवी युद्धाच्या संकटातुन अब्राहम लिंकनने सुखरुप बाहेर काढले; पण त्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. एकोणिसाच्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले.
बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात झाले. या महायुद्धाचे मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करुन सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतात राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करुन घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला. इजिप्त व इंडोनेशिया हे दोन्ही देश अनुक्रमे बिटिश आणि डचांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाले. या सर्व घटनांचा सविस्तर इतिहास प्रस्तुत पुस्तकात देण्यात आला आहे.
Adhunik Jagacha Itihas (1453 – 2000)
-
-
आधुनिक बँकिंग प्रणाली
जगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.
सदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aadhunik Banking Pranali
-
आधुनिक भारताचा इतिहास (1757 ते 1857)
पूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी इ.स. 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यामुळे त्याचवर्षी व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला आणि व्यापाराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. या काळात भारतात अनेक लहान-लहान राजवटी होत्या. त्यांच्यात परस्परात नेहमी संघर्ष होत असत. यामधूनच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच अस्थिरतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतात इ.स. 1757 मध्ये सत्ता स्थापन केली. इ.स. 1858 पर्यंत कंपनीने भारतावर राज्य केले. याच वर्षी कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राजसत्तेच्या ताब्यात गेली. प्रस्तुत ग्रंथात कंपनीच्या राजवटीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Adhunik Bharatacha Itihas (1757 to 1857)
-
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.
प्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.Aadhunik Maharashtracha Itihas
-
-
-
दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास (1206 ते 1526)
भारताचा सर्वप्रथम अरब आक्रमणांनी आक्रमणे केली. मुहम्मद बिन कासिम यांनी भारतावर पहिले आक्रमण केले. यानंतर तुर्कानी भारतावर आक्रमणे केली आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुतुबुद्दीन ऐबक हे महंमद घोरी यांच्या भारतातील राज्याचे प्रतिनिधी होते. महमंद घोरी यांच्या मृत्युनंतर इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला राज्याभिषेक करुन सुलतान ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याची राजधानी दिल्ली होती. ऐबक यांनी स्थापन केलेले हे राज्य भारतातील पहिले मुस्लिम राज्य होते. हे राज्य इ.स. 1526 पर्यंत अस्तित्वात होते. इ.स. 1206 ते इ.स. 1526 हा काल खंड दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याचकाळात गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी राजवंशाने राज्य केले. याचकाळात दक्षिण भारतात विजयनगर व बहमनी राज्य होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व प्रशासन, कला आणि वास्तुकलेचा इतिहास दिला आहे.
Delhi Sultanshahicha Ithihas (1206 te 1526)
-
निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संघटना
ग्रेट ब्रिटन, अमेरिका, चीन या देशांचे संविधान व दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क), यूनो यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. ग्रेट ब्रिटनच्या शासनव्यवस्थेत संविधानात्मक सुधारणा कायदा-2005 मंजूर केल्यानंतर या शासनव्यवस्थेतील संरचनामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत. विशेषत: ‘हाऊस ऑफ लार्डस’ सभागृहाचे न्यायविषयक अधिकार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयास देण्यात आले आहे तसेच या सभागृहाचा पदाधिकारी ‘लॉर्ड स्पीकर’ हे पदही निर्माण करण्यात आले आहे. संविधानात नवीन झालेल्या बदलांची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे.
जगात आर्थिक व सामाजिक विकासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क) दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. या संघटनेची उद्दिष्ट्ये, रचना आणि कार्याचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच यूनो संदर्भातही माहिती दिली आहे.
सदरील पुस्तकात ग्रेट ब्रिटनचे संविधान, ग्रेट ब्रिटनची संसदीय पद्धत, अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे कायदेमंडळ – काँग्रेस, दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना, चीनचे संविधान, चीनचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघ, सुरक्षा परिषद : रचना आणि कार्य, भारत-चीन संबंध महत्त्वाचे वाद प्रश्न या घटकांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेला आहे.
Nivadak Savidhane Aani Antarrashtriya Sanghatna
-
-
-
-
-
प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभ ते इ.स.1318)
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास लाखो वषार्र्ंचा आहे. मानवाला प्रगती करण्यासाठी अनेक घडामोडींतून वाटचाल करावी लागली. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पंथांचा उदय झाला. या अनेक संप्रदायांपैकी (पंथ) जैन व बौद्ध धर्म हे प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार करण्याचे श्रेय बौद्ध धर्माला जाते. बौद्ध धर्माचे अनुकरण करून कालांतराने जैन, हिंदू, शैव व वैष्णव पंथांनी कलेच्या क्षेत्रात भरीव प्रगती केली.
इ.स.पू. सहाव्या शतकात भारताच्या सीमेवर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरवात झाली. यानंतर ग्रीक, शक, कुशाण या सत्तांनी भारतावर आक्रमणे करून आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. मौर्य, गुप्त, वाकाटक व सातवाहन सम्राटांनी परकीय आक्रमणांना यशस्वीरित्या थोपविण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळाला प्राचीन भारताच्या इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. इ.स. 1318 साली यादवांचे राज्य सुलतानाच्या ताब्यात गेले. मराठी मुलखात नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांचा प्रभावच महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभ्युदयाला व मराठी भाषेच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरला.
हर्षवर्धनाच्या मृत्यूपासून मुस्लिम विजयापर्यंतचा भारतीय इतिहास राजपुतांच्या प्रभावामुळे ‘राजपूत युग’ या नावाने ओळखला जातो. प्राचीन भारतातील शिक्षणपद्धतीची माहिती संहिता, उपनिषदे, धर्मशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य व धर्मसूत्रावरून होते. काळाचा दीर्घ विस्तार, भावनांची समृद्धता, भाषेचे सौंदर्य व परिष्कृत कल्पनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय साहित्य अप्रतिम आहे. धर्म हाच प्राचीन भारतात कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता. भारतात विविध जनपदांची सत्ता असल्याने परंपरागत कायदा सर्वत्र एकसारखाच न राहता विभिन्न प्रकारचा राहिला. प्राचीन भारतात विविध उद्योगधंद्याचा विकास झालेला होता.
सदरील ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांचेही सविस्तर विवेचन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Prachin Bharatacha (Praranbh Te CE 1318)
-
भारतवर्ष खंड 1, 2, 3 (अश्मयुग ते इसवी 2000)
भारतवर्ष खंड 1 – अश्मयुग ते इसवी 1206
* प्राचीन भारतीय इतिहास *
‘भारतवर्ष’, ‘आर्यवर्त’, ‘इंडिया’, ‘हिंद’, ‘हिंदुस्तान’, ‘जम्बुद्विप’ इ. विविध नावांनी आपला देश ओळखला जातो. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना आपण कोण? मानवाचा विकास आणि त्या विकासाच्या अवस्था, भारतातील मानवाच्या सहा वांशिक प्रजाती आणि चार भाषीक समुह यांची नोंद लेखकाने घेतली आहे. त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या अभ्यासाची साहित्यीक आणि पुरातत्वीय आणि विदेशी यात्रेकरूंचे वृत्तांत साधन म्हणून नोंदविले आहेत. भारतातील प्रागैतिहासिक काळ, आद्य इतिहासकाळ आणि ऐतिहासिक काळ यांचा वृत्तांत समर्पक शब्दात मांडला आहे. जगातील सर्वात मोठी संस्कृती सिंधु संस्कृतीची नोंद विविध अंगाने शब्दबद्ध केली आहे. पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक संस्कृतिची वैशिष्ट्ये, इ.पू. 6 व्या शतकातील जैन आणि बौद्ध धर्म पंथांचा उदय आणि घडलेली प्रबोधनाची चळवळ वाचनीय आहे. संगम साहित्यात लेखक-कवि-रचनाकारांचे योगदान, प्राचीन भारतातील पहिले केंद्रीय साम्राज्य मौर्य सत्ताचा उदय-विस्तार आणि अस्त यांची माहिती एकत्रित वाचकाला मिळते. मौर्योत्तर काळात झालेले बदल गुप्त काळात निर्माण स्थैर्य आणि विकास, कला-साहित्य-स्थापत्य-निर्मिती वैभवशाली राहिली. गुप्तोत्तरकाळात प्रांतीय सत्तांचा झालेला उदय, दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात झालेले त्रिपक्षीय संघर्ष तसेच पूर्व व आग्नेय आशियाच्या भागात भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार आणि प्रचार याची नोंदही जाणीवपूर्वक लेखकाने सिद्धहस्तपणे घेतली आहे. परिशिष्ठात लेखकाने प्राचीन भारतीय सामंतशाही, चित्र आणि मूर्तीकला, विद्याकेंद्रे, संस्कारांची यादी, लिपी, महत्त्वपूर्ण विधाने, राज्य आणि राजधानी, राजवंश, शहरे, शब्दार्थ, घटनाक्रम इ. ची नोंद केली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
भारतवर्ष खंड 2 – इसवी 1206 ते 1818
* मध्ययुगीन भारतीय इतिहास *
रवींद्रनाथ टागोर ‘भारतवर्ष’ ही एक संपूर्ण भौगोलिक मूर्ती आहे असे मानतात. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना इ.स. 1206-1818 या 612 वर्षाच्या कालखंडाची मांडणी लेखकाने इस्लाम धर्माचा उदय आणि तुर्क आक्रमणे नोंदवून केली आहे. सुलतानशाही आणि मोगल सत्ता यांनी मध्ययुगीन कालखंडात भाषा, साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृति, प्रशासन, आहारविहार यांना नवीन आयाम दिले. मध्यकाळात सुफी आणि भक्तिचळवळीच्या झालेल्या उदयाने संस्कृति समन्वयच नव्हे तर भारतवर्षाच्या सर्व धर्म, पंथ, जात, व्यवहार यांना एकसंघत्वाच्या विचाराने पूढे जाण्याचा मार्ग दाखविला. मध्ययुगीन कालखंडात दिल्ली-मध्य भारत हे सत्तेचे केंद्र राहिले. अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिणेतील आक्रमण आणि मुहम्मद तुघलकाद्वारा देवगिरी हे बनलेले राजधानी केंद्र या दोन घटकांतूनच दक्षिणेच्या मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा झालेला उदय याचीच परिनीति आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरिदशाही आणि ईमादशाही यांच्या परस्परांच्या संघर्षात मराठा सरदारांचा-घराण्यांचा सर्वात मोठा सहभाग होता. नव्हे तर या सत्ता म्हणजेच मराठा सरदार आणि घराण्यांचे कार्य आणि कर्तृत्व होय. मुघलांच्या सत्तांचा काळ हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा समकालीन काळ होता. याच काळात पाश्चिमात्यांचे भारतात आगमन झाले. मराठा सत्तेचा शेवट केल्यानंतर ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला. मध्ययुगीन काळातील शब्दांचे अर्थ परिशिष्ठात दिले आहेत. सचित्र मांडणी, बल्बन, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोज तुघलक, शेरशाह सुरी आणि सम्राट अकबराच्या काळातील लेखकाने नोंदविलेल्या सुधारणा आणि योग्य ठिकाणी केलेली तुलनात्मक मांडणी हे ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
भारतवर्ष खंड 3 – इसवी 1818 ते 2000
* आधुनिक भारतीय इतिहास *
रॉबर्ट क्लाईव्हच्या प्रशासकीय व्यवस्था ते मराठा साम्राज्याचा अस्त हा कालखंड कंपनीच्या वर्चस्वासाठी सर्वात महत्त्वाचा होता. ब्रिटिशांच्या धोरणाचा हस्त, लघु आणि कृषीउद्योग यावर विपरीत परिणाम झाला. भारतीय जनता आणि संस्थानिक शासक यांची कंपनीच्या विरोधातील सार्वत्रिक प्रतिक्रिया म्हणजे 1857 चा स्वातंत्र्यलढा. 1857 च्या तदपूर्वी बहुभागात आदिवासी, कृषक इ. चे लढे अत्यंत महत्त्वूपर्ण राहिले. भारतात लागू नियमित कायदा, पीट्स अॅक्टचा प्रयत्न, 1793 ते 1853 पर्यंतचे 4 चार्टर अॅक्ट्स, 1858 ते 1935 पर्यंतच्या संघराज्य कायद्याची समर्पक संवैधानिक शब्दात मांडणी लिखाणात आहे. समाज प्रबोधन आणि प्रबोधनकार यांचे प्रयत्न, स्थानिक सत्ताधिशांनी कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकारचे झालेले संघर्ष, शेजारी राष्ट्रांशी असणारी ब्रिटिशांची धोरणे यांचे एकच सुत्र होते ते म्हणजे व्यापारवादातून साम्राज्यवाद. भारतातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, कायदे, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांची नोंददेखील या ग्रंथात आहे. स्वातंत्र्य चळवळीतील संघटना, संस्था, व्यक्ति, पक्ष-मवाळ-जहाल, म. गांधीवादी आणि क्रांतीकारक विचारधाराद्वारा घडलेला घटनाक्रम हा संघर्षशील होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानिकांचे प्रश्न, जातीय दंगली-हिंसा, राज्यघटनेची निर्मिती, भाषावार प्रांतरचना, गोवा मुक्तिलढा, सार्वत्रिक निवडणूका या घटनांतून भारतीय लोकशाहीचा विकास घडत गेला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी बहुसांस्कृतिक भारतीय लोकशाहीला समृद्ध केले. उदयमुख भारताने केलेली शिक्षण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, इतिहास, साहित्य इ. क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख प्रस्तुत ग्र्रंथात सविस्तररित्या नोंदविला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
-
भारताचा इतिहास (1857 ते 1950)
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक घटकांचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळ निर्माण करण्याची पार्श्वभूमी अनेकांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. अनेक व्यक्ती आणि संस्था यांचे योगदान ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत झाले. या दृष्टीने एकोणिसावे शतक हे महत्त्वाचे मानतात. या शतकात भारतात सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्या. या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि बौद्धिक जागृती घडून आली.
सदरील पुस्तकात सामाजिक व धार्मिक चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक गट अंर्तप्रवाह, कामगार संघटना, प्रांतीय स्वायत्तता, जमातवादाचा उदय आणि विकास, स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी या सर्व घटकांची विस्तृत व सविस्तर माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे.
Bharatacha Itihas (1857 to 1950)
-
भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1205 पर्यंत)
प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकीयांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्योत्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रियांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Bharatacha Itihas (Prambhpasun Te CE 1205 Paryant)
-
-
भारताचे परराष्ट्रीय धोरण
जगातील कोणत्याही राष्ट्राला इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मूलभूत तत्त्वे निश्चित करावी लागतात. त्याचे एखाद्या परराष्ट्राशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत. त्या संबंधातून कोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासंबंधीचे अंतिम ध्येय कोणते असावे इत्यादी प्रश्नासंबंधी त्यास साधक-बाधक विचार करावा लागतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला परराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या तत्त्वांना व धोरणांना त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण असे म्हटले जाते. सन 1947 पासून, तर 1964 पासून भारताचे पंतप्रधान नेहरु होते. भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. हे पुस्तक जसे विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त ठरणार आहे. तसेच ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची आवड पण निश्चितच उपयोगी ठरेल.
Bharatache Parrashtriy Dhoran
-
भारतातील पर्यटन स्थळे
निसर्ग सौंदर्यांची उधळण करताना परमेश्वराने विविधतेने नटलेल्या विशाल भारत देशाला अतिशय झुकते माप दिले असावे असेच वाटते. विविध प्रकारचे निसर्गसौंदर्य भारतभूमीवर सर्वदूर सहज उपलब्ध होते. हिमालयाची बर्फाच्छादीत शिखरे, हिरवीगार, शंक्वाकृती अरण्ये व निळ्या छटा असलेले सुंदर डोंगर, मसूरी, अल्मोडा, नैनीताल, पंचमढी, महाबळेश्वर, कोडाई कॅनाल व मुनार सारखी थंड हवेची व गिरीस्थाने, कित्येक किमी लांबीचे समुद्रकिनारे, रुपेरी वाळूचे बीचेस, एकीकडे वृक्ष व प्राणीविरहित थरचे वाळवंट तर दुसरीकडे घनदाट जंगले, वन्य प्राणी आणि लक्षद्वीप व अंदमान निकोबारसारखी सागरात हिरवीगार पाचूने चमचम करणारी बेटे इत्यादी विविधता असलेल्या भारत देशाला धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील लाभल्यामुळे देशी व विदेशखी पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. अशा विविधतेने नटलेल्या देशातील पर्यटन स्थळांची माहिती राज्यवार देण्याचा प्रयत्न केला आहे.
Bharatatil Paryatan Sthale
-
-
-
-
भारतीय प्रशासन
प्रशासन म्हणजे शासनाचे कृतीशील स्वरुप होय. या कृतीशीलतेमुळे प्रशासन गतिशील असावे असे सहज स्पष्ट होते, तरी प्रशासकिय संस्थाची सवय स्थिर आणि अविरत राहण्याची असते. मौर्य साम्राज्याच्या काळापर्यत शासन व प्रशासन इतके विकसित होते की, विस्तृत संख्येत शासकिय व प्रशासकिय कार्य सक्षमरित्या करण्याची पात्रता मिळाली होती. मौर्य काळानंतर मात्र शासनाची व प्रशासनाची यंत्रणा साचेबंद स्वरुपाची झाली. मोगल काळात प्रशासन सैनिकी व पोलीस स्वरुपाचे होते. प्रजेला राजकिय अधिकार नव्हते. ब्रिटिश काळात उच्च प्रशासकिय सेवा जन्मजात गुणांवर आधारित होऊन अनुवंशिक आणि प्रादेशिक गतीमानतेचा अभाव असलेली होती. तरीही प्रशिक्षित आणि निष्ठावान अशी होती. स्थानिक स्तरावरील प्रशासन स्वायत्त, विकेंद्रीत आणि स्वशासित स्वरुपाचे होते. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले. भारतीय वातावरणाला साजेसे एक व्यावहारीक संविधान करणे हेच घटनाकारांचे उद्दिष्ट होते. आधुनिक काळात राज्याला कल्याणकारी राज्य-प्रशासन कार्याची भूमिका पार पाडावी लागत आहे. प्रशासनाला जनतेच्या कल्याणाचा विचार करुन कार्य करावे लागते.
सदरील ग्रंथात प्रशासनाशी संबंधित सर्व घटकांचा मुद्देनिहाय समावेश करून त्याचे सविस्तर विवेचन केलेले आहे. ग्रंथाची भाषा साधी, सरळ व सोपी असून सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ ठरावा यासाठीच लेखनप्रपंच!
Bharatiy Prashasan
-
भारतीय प्रशासन आणि राजकारण
‘भारतीय शासन आणि राजकारण’ हा ग्रंथ युजीसी पॅटर्नचा अवलंब करुन तयार करण्यात आला आहे. दिवसेंदिवस भारतीय प्रशासनात व राजकारणात अनेक बदल होत असून होणारे बदल सर्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. सदरील पुस्तक यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी साधी व सरळ आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा समावेश करून त्याबाबत सखोल व सर्वांगिण चर्चा ठिकठिकाणी केली आहे.
प्रस्तुत पुस्तकात एकूण 40 प्रकरणांचा समावेश असून ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समिती निर्मिती, भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने, भारतीय घटनेचा सरनामा, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये, मागदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, केंद्र सरकार, भारताचे राष्ट्रपती, केंद्रसरकार, उपराष्ट्रपती, भारताचा पंतप्रधान, पंतप्रधानाचे कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ, भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, समितीय पद्धती, केंद्रिय मंत्री, सचिवालय, घटक राज्याचे विधीमंडळ/कार्यकारी मंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, घटक राज्याचे मंत्रीमंडळ, मंत्रीमंडळाचे सचिवालय, घटक राज्यविधी मंडळ विधानसभा, विधान परिषद, भारतातील न्याय व्यवस्था-सर्वोच्च न्यायालय, दुग्ध व्यवसाय, दुय्यम न्यायालये, घटनादुरुस्ती, भारतातील, निर्वाचन आयोग, राष्ट्रीय एकात्मता, राजकिय पक्ष, भारतातील दबाव गट, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षा/ महान्यायवादी/महाधिक्ता, भारतीय राजकारभारातील मुख्य प्रश्न/समस्या-जाती/जातीयवाद, धर्माधर्मवाद, भाषा/ भाषावाद, प्रादेशिकता, दहशतवाद इत्यादी प्रकरणांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्यात आलेला आहे.
Bharatiya Prashasan Aani Rajkaran
-
-
भारतीय राज्यघटना (भाग 1)
भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.
प्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.
Bhartiya Rajghatna (Bhag 1)
-
भारतीय राज्यघटना (भाग 2)
भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.
प्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.
Bhartiya Rajghatna (Bhag 2)
-
-
-
भारतीय संविधान व शासन
‘भारतीय संविधान व शासन’ हा अभ्यास विषय स्वांतत्र्योत्तर कालखंडापासून विशेष महत्वाचा मानला जातो. हे अध्ययन क्षेत्र केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जातात. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून “भारतीय संविधान व शासन’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.
या ग्रंथात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना समकालीन सामान्य ज्ञान संबंधीचे प्रश्ने, राज्यशास्त्रातील दैनंदिन घडामोडीकरिता हा ग्रंथ निश्चितपणे उपयोगी ठरेल यात शंका नाही. हा प्रस्तुत ग्रंथ जरी पदवी स्तरावर तयार करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना लाभदायक ठरू शकेल, अशी मांडणी यामध्ये करण्यात आली आहे.
Bharatiy Sanvidhan v Shasan