• कथारंग

    कथारंग

    विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञान कथा व विनोदी कथा अशा दोन कथाप्रकारांची ओळख करून देणारे सदर पुस्तक आहे. मानवी नातेसंबंध, मानवी मूल्ये यांपुढे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अफाट प्रगतीने उभी केलेली आव्हाने विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावीत आणि त्याबाबतची त्यांची जाण प्रगल्भ व्हावी या भूमिकेतून विज्ञान कथांची निवड करण्यात आली आहे. आभासी विश्वाच्या तात्कालिक भुलभुलैयात गुरफटल्यामुळे जगण्यातील समाधानाचे क्षण हातातून निसटत चालले आहेत. शब्द, वाक्य, भाषा, स्वभाव, वर्तन, व्यवहार अशा विविध स्तरांवरील गमत-जमती आज सापडेनाशा झाल्या आहेत. याचे भान विद्यार्थ्यांना यावे म्हणून विनोदाच्या निरनिराळ्या परी व्यक्त करणार्‍या निवडक विनोदी कथांचा समावेश सदर पुस्तकात करण्यात आला आहे. यासोबतच विज्ञानकोशासाठी नोंद लेखन आणि विज्ञानपर लघुलेख लेखन या उपयोजित घटकांची जोड येथे देण्यात आली आहे.

    Katharang

    Rs.85.00
    Add to cart
  • कथाविश्व

    कथाविश्व

    कथांची निवड करतांना सद्य ः कालीन जीवनाचे प्रश्न व मूल्यविवेक यांचा विचार केलेला आहे.
    ‘मानवता हे मूल्य जात, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रदेश विशिष्टता यांच्या पलीकडे असलेले सर्वेच्च मूल्य आहे’ – हे वामन चोरघडे यांच्या ‘हादरा’ या कथेचे प्रमुख सूत्र आहे.
    ‘प्रसार माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून घटनांचे वार्तांकन केले नाही तर एखादी क्षुल्लक घटना मोठ्या उद्रेकाचे कारण ठरु शकते.’ हे अरुण साधूंच्या ‘दंगा’ कथेतून सूचित केले आहे.
    ‘माणूस हा बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी आहे. पण बुद्धीच्या पाठीमागे भाव असावा की भोग? बुद्धीचा उपयोग भोगासाठी केला की माणसाचा पशू होतो’. हा रत्नाकर मतकरींच्या ‘एक माणूस आणि एक पशू’ या कथेचा आशय आहे.
    ‘केवळ देणं हाच ज्यांचा जीवनधर्म आहे; अशी माणसं जेव्हा स्वतःसाठी मागतात तेव्हा त्यांच मोठेपण संपून जातं.’ हे कल्पवृक्षाच्या रुपकातून विजया दिक्षित यांनी ‘एका झाडाची इच्छा’ या कथेतून मांडलेलं आहे.
    ‘श्रद्धा, लेाकश्रद्धा, अंधश्रद्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांचे संस्कार. बालसुलभ मनावर कसे कोरले जातात’ याचे प्रत्ययकारी दर्शन योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ कथेतून घडते.
    ‘वठलेलं झाड फुलवण्यासाठी कोवळ्या अंकुराचा बळी देणं कितपत संयुक्तिक आहे.’ हा प्रश्न ‘महात्मा’ कथेद्वारे लक्ष्मण लोढे यांनी उपस्थित केला आहे.
    ‘रोजा-एकादशी आणि भाकरी यांची कष्टकर्‍यांच्या वेदनेशी-जोडलेली नाळ’ संजीव गिरासे यांच्या ‘जकात’ कथेत दिसते.
    सारांश या कथा विद्यार्थ्यांना व वाचकांना व्यक्तीजीवन व समष्टीजीवनाचं उन्नयन करणार्‍या मूल्यांची ओळख करुन देतील. असा विश्वास वाटतो. कथेच्या रुपबंधाच्या अभ्यासाच्या जोडीने कथेतील चिरंतन मूल्यांचाही विचार व्हावा ही अपेक्षा आहे.

    Kathavishrva

    Rs.50.00
    Add to cart