• निवडक कथा

    निवडक कथा

    कथा हा वाङ्मय प्रकार अतिशय लवचिक असतो. जीवनातले विविध ताण-तणाव, प्रसंग, घटना कथेच्या केंद्रस्थानी असतात. मराठी कथेचा प्रवाह लोककथा, जातककथा, जातककथा, इसापनिती, पंचतंत्र इत्यादीनी समृद्ध आहे. प्रत्येक काळात त्यात भर पडतच आहे. साहित्याने जग अधिक सुंदर, लोभस, मोहक करावे हा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. अनुभवाची श्रीमंती, समृद्धी हेच साहित्यिकांचे खरेखुरे वैभव असते. उत्कट जिज्ञासेपोटी व संवेदनशील मनातून चांगल्या साहित्याची निर्मिती होते. ‘निवडक कथा’ निवडताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा निश्चितपणे विचार केलेला आहे. या कथा तरुणाईला भावतील अशाच आहे. कथांची निवड करताना मूल्य, संस्कार यांना निश्चितच महत्त्व दिले आहे. कथांमधून उमद्या भावनांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल व विद्यार्थ्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी ह्या कथा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास वाटतो.

    Nivadak Katha

    Rs.75.00
    Add to cart
  • बहिणाईची गाणी

    बहिणाईची गाणी

    कविता ही कवीला उपलब्ध असलेल्या जीवनावकाशाची अभिव्यक्ती असते. कौटुंबिक ते सामाजिक अशा विभिन्न स्तरांवरील भावभावना, संवेदना, विचार, अनुभव यांचे विश्व जीवनावकाशाला आकार देत असते. अशा जीवनावकाशाला अंत:करणात मुरवून शब्दबद्ध करण्यातून कवितेच्या निर्मितीला अवसर प्राप्त होत असतो. ही प्रक्रिया जितकी मौलिक तितकी कवितेतील काव्यात्मता खुलून येत असते. या निकषावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी साकारलेले काव्यविश्व अनोखे आहे. कृषिजनसंस्कृती, तिचे भरणपोषण करणारा निसर्ग, नातीगोती, सण-उत्सव, कष्टकर्‍यांच्या जगण्याची लय, गावगाडा या जीवनावकाशाच्या गाभ्याला अंत:करणात मुरवून शब्दांवाटे आपल्यापर्यंत पोहचविणारी ही कविता काव्यात्मतेचा उत्तुंग आविष्कार आहे. मानवी जीवनाला तोलून धरणार्‍या सचोटी, मेहनत, कर्तृत्व, जिव्हाळा, सुख-दु:खविषयक समभाव, सश्रद्ध वृत्तीचा स्वीकार-अंधश्रद्ध वृत्तीला नकार, साहचर्य भावना, धैर्य अशा आधुनिक मानवाच्या जगण्यातून हरपत गेलेल्या मूल्यभावाचा झरा अनेकवार आपल्या अंत:करणात पाझरविणारी ही कविता आहे. कविता आणि जगणे यांच्या अद्वैताचा हा अक्षय ठेवा अनेक पिढ्यांना पुरणारा आहे.

    Bahinabaichi Gani

    Rs.110.00
    Add to cart