-
-
युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू)
Rs.150.00युद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युद्ध राष्ट्राच्या अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आवश्यक बाब असल्याने प्रत्येक राष्ट्र स्व-संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षेची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. प्राचीन काळापासून भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य, संरक्षण व सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्याने परकियांची सातत्याने आक्रमणे झाली. अनेक मोक्यांच्या वेळी भारतीयांना परकीयांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारत हा जगातील नैसर्गिक-स्वाभाविक दृष्टीने सुरक्षित असूनही सीमेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने, आक्रमकांविरूद्ध योग्य उपाययोजना न केल्याने आपल्याला वारंवार पारतंत्र्यात जावे लागले. प्रस्तुत ग्रंथात युद्ध, संघर्षांची कारणे, परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पना, युद्धोत्तर निराकरण आणि संघर्षोत्तर शांतता निर्माण करण्यासाठीची धोरणे वगैरे विविधांगी मुद्द्यांचा विश्लेषणात्मक उहापोह केला आहे.