-
Agricultural Informatics and Artificial Intelligence
This book serves as a comprehensive guide for **B.Tech (Agricultural Engineering & Technology)** students, offering a simplified introduction to Agricultural Informatics and Artificial Intelligence. It is meticulously designed to align with the **NHEP-2020 vision** and the **6th Deans’ Committee syllabus** of ICAR, specifically for Maharashtra State Agriculture Universities (SAU).
Key Highlights:
- Basics of ICT in Agriculture : Computer applications, multimedia, database management, mobile apps, and decision-making processes.
- Emerging Technologies : Artificial Intelligence, IoT, Big Data, Geospatial technology, e-Agriculture, and innovative IT tools for agriculture.
- Practical Applications : Computer models, smartphone apps, decision support systems, crop calendars, and government digitalization schemes like Digital India.
- Departmental Insights : Coverage of various Agricultural Engineering disciplines such as Farm Power, Process Engineering, Irrigation, and Soil & Water Management.
Structured into concise chapters for beginner-friendly learning, this book ensures smooth comprehension of complex topics. It also includes previous years’ question papers to aid in exam preparation.
Designed to equip students with essential ICT and AI skills, this text is an invaluable resource for enhancing the quality of agricultural education, research, and extension programs in the era of digital transformation.
-
-
-
Indian Economy
“Indian Economy; Issues and Challenges”. India is an upcoming super power with comparatively a good growth rate to other countries in the year 2020.
It is a second largest populated economy of the world. Therefore, India is facing several issues related to employment generation, low income and low purchasing power, poverty, lack of infrastructural facilities, inflation, human development index, and some social issues, etc. therefore, all these issues are under control and if the proper action plan implemented with full equipped action force, surely these all weaknesses will be overcome and India will be superpower in coming years. Definitely there are many areas where India has to focus to make these areas developed. -
Indian Economy : Opportunities and Challenges
This edited book on Indian Economy : Opportunities and Challenges is an effort in the direction of evaluating the impact of different sectors and analyzing the government’s policies to combat this pandemic situation. Scholars have tried to suggest new strategies and measures to handle such an unprecedented event. It is just an effort to share our different thoughts. We are not perfect in divulging the ways out but we are trying to be a part of all discussions to fight this downturn.
-
Industrialization and Socio-Environmental Issues
Industrialization is one of the most important aspects of development in India. But the rapid growth of industrialization is proving harmful to nature. The process of industrialization is bringing drastic changes and creating pollution of air, water, land and forest. Industrialization has caused the imbalance in natural vegetation and cultural environment. It is also affecting the eco-system & biodiversity on the Earth. The industry exploits most of natural resources and the waste is released without any processing. This causes many problems to life on the Earth. It also creates imbalance; especially to the social environment. This problem may be worst in future.
-
-
-
-
-
-
-
Rural Industrialisation in India
Society can flourish when all sections of populace, sectors of economy and different regions can draw benefits to prosper and progress. Despite India becoming a major power in terms of reasonably high growth rate, it is the home of the largest number of poor. There is a paradoxical situation that benefits of growth have not percolated to all regions and segments of population. Incidence of poverty on account of deprivation in many areas, in terms of socio-economic infrastructure is more evident in rural India. The book centers around this core theme hence takes up the case for rural folks living in countryside. The book covers suggestions based on appraisal to make rural industrialisation more pragmatic and practical in the present context of globalisation. It helps readers in better assimilation on the subject.
-
-
अर्थशास्त्राची मूलतत्त्वे
अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. 16 व्या व 17 व्या शतकात व्यापारवादी विचारवंतानी शासनाला ज्या शिफारसी व धोरणे सुचविली ती अर्थव्यवस्थेसंदर्भातच होती. 18 व्या शतकात निसर्गवादी फ्रेंच विचारवंतानीसुध्दा राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यावर विश्लेषण केलेले दिसून येते. तसेच अॅडम स्मिथ, रिकार्डो, जे.एस.मिल यांच्या सिध्दातांतही राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण वेतन, एकूण खंड व एकूण नफा यामध्ये होणार्या विभाजनाविषयी चर्चा केलेली आढळते. 1929 च्या जागतिक महामंदीनंतर मात्र अर्थशास्त्रीय विचारात मूलभूत व क्रांतिकारी बदल झालेले दिसतात. लॉर्ड केन्स यांचे 1936 मध्ये ‘द जनरल थिअरी’ हे युगप्रवर्तक पुस्तक प्रकाशित झाले. केन्सने प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचा पाया रचला. सदर पुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या, उपयोगिता दृष्टीकोण, मागणी व मागणीची लवचिकता, उत्पादन फलन, उत्पादन व्यय, प्राप्ती किंवा उत्पन्न ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा उहापोह केला आहे.
Arthashasarachi Multatve
-
-
-
अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती
सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत असतो. संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो. संशोधनाद्वारे नवनवीन कल्पनांची मांडणी केली जाते. त्या अनुरोधाने सखोल पहाणी किंवा प्रयोग करून पूर्वी मान्य असणार्या अनुमानांना नवीन रूप दिले जाते. संशोधन हे प्रामुख्याने नवीन ज्ञानाची भर वेळोवेळी घालीत असते. अध्ययनाद्वारे निरीक्षणातून तुलना करून आणि प्रयोगातून सत्यता पडताळून पाहिली जाते.
सदरील पुस्तकात संशोधनाच्या विविध संकल्पना, सिद्धांत व तंत्रे सर्वांना सहजतेने समजावीत यासाठी साध्या-सोप्या भाषेचा वापरासोबतच शास्त्रीय संकल्पनांच्या मूळ अर्थाला बाधा येणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.
सदरील पुस्तक हे विविध विद्याशाखांच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी, नेट/सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.Arthashastriya Sanshodhan Paddhati
-
-
-
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासाची स्वतंत्र शाखा म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उगम पावलाचे दिसून येते. सन 1929 मध्ये अमेरिकेला मंदीचा फटका बसला त्यामुळे सर्व जगाला व्यापून टाकले. संकटावर मात करण्यासाठी, प्रत्येक देशाने स्वत:ची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून एक व्यापक व्यापार योजना अवलंबली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परस्पर हितसंबंधांचे अतूट, साहजिकच, शिवाय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधातील काही उत्तम व्यवस्था अवलंबण्याचा प्रयत्न झाला आहे. विसाव्या शतकात आणि त्यानंतरपासून जागतिक एकीकरण वेगाने वाढले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या ऑपरेशनमुळे व्यापार निर्बंध आणि नियम कमी केले जात आहेत, म्हणूनच जागतिकीकरणाला वेग आला आहे.
सदरील ग्रंथात व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराची तत्त्वे, व्यापाराचे फायदे, व्यापार धोरणे, विनिमय दर, भारताचा परराष्ट्र व्यापार व धोरणे, जागतिक व्यापार संघटना, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय सहकार्य व निर्यातीत विशेष आर्थिक क्षेत्रांच्या धोरणाचे मूल्यांकन इत्यादीचे सखोल लिखाण केले गेले आहे. विद्यार्थ्यांना समजू शकेल अशी सोपी भाषा, परिभाषा कसे वापरता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच स्पर्धा परीक्षा, सेट, नेट परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.Antarrashtriya Arthashastra
-
-
आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत आणि व्यवहार
आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहिले जाते. व्यापार माध्यमातून जगातील सर्वच देशांचा कमी-जास्त वेगाने आर्थिक विकास होऊ लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार माध्यमातून प्रत्येक देश आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांवरील अवलंबित्वातूनच जगातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो. व्यापार मुळात लाभ मिळविण्याच्या हेतुने केला जातो. एखादा देश आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न असला तरी संपुर्णत: स्वयंपूर्ण असू शकत नाही. कारण देशात सर्वच वस्तू व सेवांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होतेच असे नाही. वस्तू व सेवांची देशांतर्गत टंचाई दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते, तसेच देशातील वस्तू व सेवांचे अतिरिक्त उत्पादन खपविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातून देशा-देशांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होतात, सहकार्याची आणि एकात्मकतेची भावना निर्माण होते, विकसित देश विकसनशील देशांना विकासासाठी मदत करतात.
प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ-हानी, विविध सिद्धांत व धोरणे, व्यापारतोल, विदेशी विनिमय दर, विदेशी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्या, विदेश चलन गंगाजळी, विविध आंतरराष्ट्रीय संस्था व परिषदा, जागतिक वित्तीय संकट 2008, रुपयाचे अवमूल्यन आणि परिवर्तनियता इ. मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.– प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण
Antarrashtriy Vyapar And Vyavahar
-
-
-
-
आधुनिक बँकिंग प्रणाली
जगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.
सदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aadhunik Banking Pranali
-
-
आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार
आजच्या प्रगत काळात दिवसेंदिवस बँक व्यवहाराचे व वित्तीय बाजाराचे महत्त्व वाढत आहे. अर्थव्यवस्थेत बँका व वित्तीय संस्थांचा जस-जसा विकास आणि विस्तार होत जातो, तस-तसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्व अनन्य साधारण आहे. बँक जे व्यवहार करते त्यात बरीच जोखीम असते. त्या जोखीमचे व्यवस्थापन करावे लागते. भारतासह जगातील सर्वच बँक व्यवसायामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यात प्रामुख्याने बँकांचे संगणकीयीकरण, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग, एटीएम, डेबीट कार्ड, टेली बँकींग, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस, स्वीफ्ट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रियल टाईम ग्रास सेटलमेंट, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई-परचेस, ई-मनी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अॅट पाँईट ऑफ सेल इत्यादी साधनांचा वापर केला जात आहे. प्रतिभूती बाजार हे वित्तीय बाजाराचे एक अभिन्न अंग आहे. वित्तीय बाजारात अल्पकालीन आणि दिर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण केली जाते. नाणेबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण चालते. यासाठी अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्जे, कोषागार हुंड्या, व्यापारी हुंडया या साधनांचा वापर केला जातो. भांडवल बाजार दीर्घकालीन कर्जे, गुंतवणूक देवाण घेवाण केली जाते.
प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँकींग व वित्तीय बाजाराची इत्यंभूत माहिती देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.Adhunik Banking Ani Bharatiya Vittiya Bajar
-
-
आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास
‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.
इंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.
Awas Yojana Aani Anusuchit Jati v Jamatincha Vikas
-
औद्योगिक अर्थशास्त्र
आधुनिक काळात औद्योगिक व आर्थिक विकासात उद्योगधंद्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. आधुनिक काळात ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ हा विषय विकसित होत आहे. 1930 च्या जागतिक महामंदीच्या काळात औद्योगिक अर्थशास्त्र प्रस्थापित झाले. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये मोठे उद्योग, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन कार्ये यांचे महत्त्व वाढल्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्र असेही म्हणतात. म्हणून उद्योग आणि उद्योगासंबंधीचे घटक या विषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, आवश्यकता, महत्त्व याबरोबरच औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक, उद्योग संस्थेची वर्तवणूक, संगनमत एकत्रीकरण यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच उद्योगाची स्थाननिश्चिती, स्थानिकीकरणाचे घटक त्यासंबंधीचा वेबरचा व फ्लोरेन्सचा सिद्धांत याविषयीचा अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. तसेच गुंतवणूक संशोधन विकास किंमतविषयक पद्धती, प्रकल्पाचे मूल्यमापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंमतविषयक निर्णय, किंमत पद्धतींचा हा अभ्यास केलेला दिसून येतो. पहिल्या भागात वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर दुसर्या भागात खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, उदारीकरण, जागतिकीकरण, लघुउद्योग व मोठे उद्योग, त्यांच्या भूमिका व समस्यांचा विचार केलेला आहे.
Audyogik Arthashastra
-
औद्योगिकीकरण आणि सामाजिक-पर्यावरणीय समस्या
औद्योगिकीकरण म्हणजेच आर्थिक विकास म्हणता येईल. कोणत्याही देशाची प्रगती ही निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते. औद्योगिकरण हा त्यातील एक घटक होय. कारण औद्योगिकीकरणाच्या वेगावर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशाचा आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी औद्योगिकरणावर भर दिलेला आहे. जगात वरचढ स्थानासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राष्ट्रे विकसनशील देशांत अधिकतम उद्योगधंदे निर्माण करायला प्रोत्साहन देत आहेत, वेळ प्रसंगी दबाव आणत आहेत. आज देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणाद्वारा उत्पादन वाढविण्याशिवाय पर्याय उरला नाही.
प्रदूषण, मानवी स्वास्थ्य व समाजातील विविध समस्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. औद्योगिकीकरणामुळे आपल्या समाजात विविध समस्या निर्माण होत आहे व प्रदूषणही वाढतांना दिसत आहे. या सर्वांचा विचार सरकार बरोबर सर्व जनतेनेही करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन उद्योग हे शहराऐंवजी खेड्या-पाड्यात सूरु केले तर शहरीकरणाची समस्या कमी होऊन प्रदूषणही कमी होण्यात मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या देशातील औद्योगिकरणाचा विकास वाढविला पाहिजे औद्योगीक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली आहेत. औद्योगिक विकासामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. नैसार्गिक साधन संपत्तीचा औद्योगिक विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. नैसार्गिक साधन संपत्तीच्या अति वापरामुळे पर्यावरणावर त्याच्या प्रभाव दिसून येत आहे.Audyogikikaran Ani Samajik-Paryavaraniya Samsya
-
कापूस प्रक्रिया उद्योग
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कापूस पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होते. सर्वच जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योग आहेत. या उद्योगाचा कल सामान्यतः विकेंद्रीकरणाकडे आहे. महाराष्ट्रातील या उद्योगधंद्यामुळे विशेषतः ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण होत आहे. हा उद्योग श्रमप्रधान आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे. तसेच शहरात होणार्या लोकांच्या स्थलांतराला या उद्योगामुळे काहीअंशी आळा बसतो. या उद्योगात एकाच वेळी अनेक क्षेत्राचा विकास होतो. यात स्थानिक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. वेळ, श्रम, पैसा वाचतो म्हणून या उद्योगाला अतिशय महत्त्व आहे.
या कारखान्यांचा पूर्वइतिहास पाहता, ब्रिटिशकाळापासून हे कारखाने महाराष्ट्रात स्थापन झाले आहेत. अनेकदा हे कारखाने सुरू झालेत आणि बंद पडले आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील कापूस प्रक्रिया उद्योगाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे. या पुस्तकाचा वाचकाबरोबर सरकार, संशोधक, उद्योजक, कापूस उत्पादक शेतकरी, तसेच या उद्योगावर आधारित पूरक उद्योगधंद्यातील उद्योजक यांना उपयोग होणार आहे. भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांच्या प्रगतीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
अतिशय सोपी भाषा, स्थानिक भाषा व संकल्पनांचा वापर, आलेख, तक्ते, नकाशे, फोटो यांचा वापर केल्यामुळे हे पुस्तक समजण्यास सोपे झालेले आहे. लेखकाने क्षेत्र भेटी देऊन गोळा केलेली माहिती व आकडेवारीच्या साहाय्याने केलेले विश्लेषण वास्तव परिस्थितीचे दर्शन घडविते. अत्यंत मेहनत घेवून तयार केलेले हे पुस्तक कापूस उद्योगास तसेच अर्थशास्त्राच्या अभ्यासकास उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
Kapus Prakriya Udyog
-
कृषी अर्थशास्त्र
भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात शेतीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 68% जनता या क्षेत्रात गुंतलेली आहे. जगातील कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान असते.
20 व्या शतकाच्या सुरूवातीला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ‘कृषी अर्थशास्त्र’ कार्यरत झाले. दुसर्या जागतिक महायुद्धानंतर या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातील बहुसंख्य विकसनशील अर्थव्यवस्थांमधील उदा. राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य, कच्चा मालाचा पुरवठा, रोजगार वगैरे क्षेत्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत जाणार्या लोकसंख्येची अन्नधान्याची आणि सातत्याने वाढत जाणार्या विविध उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज शेती क्षेत्राकडूनच पूर्ण होत आहे.
कृषी आधारीत अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगाधारीत अर्थव्यवस्थेत होण्यासाठी शेतीबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन बदलवून आधुनिक दृष्टीकोनाचा स्विकार होणे काळाची गरज ठरते. संसाधनाचा योग्य वापर, घटकांचा युक्त संयोग, पर्यायी उत्पादन तंत्राची निवड, विपणनाच्या समस्या, व्यवस्थापन, उत्पादन फलन इत्यादी अनेक बाबतीत कृषी अर्थशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकते. शेती क्षेत्रात व्यापारी दृष्टीकोन रुजवण्यात शेतीच अर्थशास्त्र महत्वपूर्ण योगदान देवू शकते.
Krushi Arthashastra
-