-
कृषी विकासाचे अर्थशास्त्र (आव्हाने व उपाय)
भारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे. पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे.
-
कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट
गृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.
Kautubik Sansadhanache Vyavsthapan V Antarik Sajawat (Part 1)
-
-
-
चर्मकार समाज : संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ
दारिद्य्र कुटूंबात जन्माला आलेली माणसे दारिद्य्रात जन्मतात व दारिद्य्रातच मरण पावतात असे म्हटले जाते. दारिद्य्रात जीवन जगणार्या माणसाला प्रगती करण्यास आवश्यक त्या साधनांची व संधीची कमतरता असते. त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी परंपरांचा पगडा अधिक असल्यामुळे दारिद्य्रातून बाहेर पडण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. समाजातील दारिद्य्रात जीवन जगणार्या लोकांना प्रगती करण्यास सधन व प्रस्थापित समाज अडसर ठरतो. शासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे तो समाज दारिद्य्राच्या दुष्टचक्रात अडकतो.
भारतात व महाराष्ट्रात विविध जातीसमूह तसेच जमाती समूह दारिद्य्रात जीवन जगतांना आढळतात. महाराष्ट्रात चर्मकार (चांभार) जमात हा असाच एक जातीसमूह आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरीबी/दारिद्य्रात व मागासलेपणात जीवन जगत आहे. चर्मकार समाजाला चप्पल, बूट दुरूस्त करणे, बूट पॉलीश करणे एवढ्या कामावर उदरनिर्वाह करणे कठीण झाले. स्वत:ची जमीन नसल्याकारणाने शेतीतून मिळणार्या उत्पादन प्राप्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. बँकेकडून मिळणारे कर्ज दुरापास्तच झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कल्याणकारी राज्याचा स्विकार करून, समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित स्थापन केले. या महामंडळाद्वारे आर्थिक सहकार्य करून चर्मकार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे विविध प्रयत्न सुरू झाले.Charmakar Samaj : Sant Rohidas Charmodhyog Vikas Mahamandal
-
परिचयात्मक अर्थशास्त्र
मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.
म्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.Parichyatmak Arathashastra
-
-
-17%
बँक व्यवसायाची तत्त्वे व कार्यपद्धती
Bank Vavsayachi Tatve v Karyapaddhati
-
-
-
बँकिंग तत्त्व आणि व्यवहार
आज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. 20 व्या शतकाच्या मध्यात जगातील सर्व देशांमध्ये बँकींगचा विकास व विस्तार करण्यासाठी त्या-त्या देशाच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. बँकिंगच्या सर्वांगीण विकासामुळे बँकिंग क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राचा दर्जा मिळाला. दररोजच्या आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 60% व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून होतात असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. इतके आज आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत झालेले आहोत. बँकिंग क्षेत्रात अवलंबिण्यात येत असलेले नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा ह्यामुळे तर बँकिंग क्षेत्र बँकेच्या ग्राहकांचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आज व्यापार- व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र, कृषीक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र अशी विविध क्षेत्र बँकांनी व्यापली असून ह्या क्षेत्रात बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या, विविध नमुने (खारसशी) तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सुलभ होईल अशी खात्री आहे.
या पुस्तकात ए.टी.एम., टेली बँकिंग, ई.एफ.टी., ई.सी.एस., डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-पर्चेस, ई-मनी, कोअर बँकिंग, सी टी एस ई एफ टी ओ एस अशा बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा व तंत्रज्ञान या सारख्या बँकिंगमधील आधुनिक प्रवृत्ती अभ्यासण्यात आल्यामुळे हे पुस्तक बँकिंग संबंधात अत्याधुनिक झाले आहे.Banking Tattv Ani Vyavhar
-
बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती
वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र ही एक गतीमान विद्याशाखा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात. त्या वाणिज्य विद्याशाखेत प्रतिबिंबीत होतात. खरे म्हणजे ही विद्याशाखा प्रत्येक देशात एक लिडरच्या भूमिकेत वावरत असते. अर्थव्यवस्थेचा गाडा सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असतो. याची ही विद्याशाखा धोरणकर्त्यांना जाणिव करून देत असते. देशाच्या अर्थखात्याचा प्रमुख अर्थशास्त्र व वाणिज्यचा जाणकार असेल तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेवून पोहोचवतो हे प्रा. सी. डी. देशमुख, डॉ. मनमोहन सिंग ह्या माजी अर्थमंत्र्यांनी सिद्ध केले आहे.
वाणिज्य विद्याशाखेत बँकींग अॅन्ड फायनान्स हा एक कोअर विषय आहे. उद्योगधंद्यांना कर्जरूपाने रक्त पुरवठा करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. बँक हा एक नफा तोट्याला जबाबदार असणारा व्यवसाय आहे. काळानुरूप त्यात सतत बदल होत आहेत. आजची भारतीय बँकींग प्रणाली बरीच विकसित झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची गती वाढविण्याचे कार्य बँका आणि वित्तीय संस्था करीत आहेत.Banking Multattve Karyapaddhati
-
भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने
सदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची समस्या व उपाययोजना, आर्थिक विकास, आत्मनिर्भर भारत, कामगार समस्या, रोजगार योजना आणि विकास, शेती समस्या आणि विकास, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक विचार इत्यादी घटकांचा आढावा घेतलेला आहे.
या संपादित पुस्तकामध्ये लेखकांनी त्यांचे लिखाण संशोधन करून मांडलेले आहेत तसेच या समस्येवर विविध उपाय सुचवले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंना स्पर्श करून त्यातील संधी व आव्हाने यांचा शोध घेऊन वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक संपादक या नात्याने वैचारिक मेजवानी म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.Bhartiya Arthavyavastha- Sandhi ani Avhane
-
भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)
भारताचा विदेश व्यापार प्राचीन व अर्वाचीन काळापासून अनेक देशांशी चालत आलेला आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. गोळा झालेला निधी कर्ज, उधारी, गुंतवणूक रूपाने उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंमत स्थैर्य आणि बँकींग क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या वस्तू किंवा सेवांचा उत्पादनखर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो, अशा वस्तू उत्पादनात श्रम विभागणी आणि विशेषीकरण केले जाते, श्रम विभागणी आणि विशेषीकरणातून उत्पादनात वाढ होते. जागतिक पातळीवर जगातील बहुतांश देशांनी 1970 च्या दशकापासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आर्थिक सुधारणांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतीय वित्तीय प्रणाली, बँकिंग, विदेश व्यापार व व्यवहारतोल, जागतिकीकरण, संघीय वित्तीय प्रणाली, सरकारचा महसूल, खर्च, कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा इ. मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.Bharatiya Arthavyavastha
-
-
-
भारतीय अर्थव्यवस्था 1980 पासून (भाग 1)
दरवर्षी सरासरी 7% आर्थिक विकास साध्य करणारी, एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून जगातील सहाव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे येत आहे. अलीकडील भारतीय अर्थव्यवस्था ही एक गतीमान अर्थव्यवस्था आहे. जागतिक पातळीवर विकासाबाबत अग्रेसर आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दारीद्य्र, बेरोजगारी, विषमता, काळा पैसा या प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारने अलीकडील काळात थेट लाभ हस्तांतरण, जनधन योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, मेक इन इंडिया ह्या योजना सुरू केल्या आहेत. काळा पैशावर आघात करण्यासाठी चलन निश्चलनीकरण केले. अप्रत्यक्ष करांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर लागू केला.
सदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, मानव संसाधन व संबंधित समस्या, पायाभूत संरचना, भारतीय कृषीशी संबंधित बाबी, औद्योगिक व सहकारी क्षेत्र, नियोजन आणि नीति आयोग आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील अलिकडील बदलांचा समावेश केलेला आहे.
Bharatiya Arthavyavastha 1980 Pasun (Bhag 1)
-
-
-
-
भारतीय अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती (1990-1991 पासून)
1947 नंतर भारतात आर्थिक नियोजनामुळे विकासाला सुरवात झाली. कृषी उद्योग व सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हायला लागले परंतु काही चुकीच्या निर्णयांमुळे, राजकीय धोरणकर्त्यांमुळे 1990 मध्ये देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला. जुलै 1991 मध्ये जागतिक बँकेच्या रेट्यामुळे आर्थिक सुधारणांना सुरवात करावी लागली. आर्थिक सुधारणामुळे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू झाली. भारतात आर्थिक प्रगतीच्या दिशेने आर्थिक बदलांची प्रक्रिया सुरू झालेली असून आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून जगातील तिसर्या क्रमांकाचा एक सामर्थ्यशाली देश अशी गणना होऊ लागली आहे. सध्या सत्तेत असलेल्या ‘मोदी इकॉनॉमिक्स’मुळे भारताची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू झालेली असून 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पाहात आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या, जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास, कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्यक्षेत्र अंतर्गत परकीय व्यापार, व्यवहारतोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती, वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. अर्थविषयक विविध मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.Bhartiya Aarthvyavsthechi Saddyasthiti (1990-91 Pasun)
-
-10%
भारतीय अर्थव्यवस्थेचे परिदृश्य (1980-81 पासून)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नोव्हेंबर 2010 ला भारताला भेट दिली तेव्हा म्हटले होते की, ‘भारत हा विकसनशील देश राहीलेला नसून तो यापूर्वीच विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.’ आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून तो अथृसत्ताक बनलेला आहे. अमेरिका आणि चीननंतर आता जगातल्या 193 अर्थव्यवस्थांमध्ये / देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. जगात आर्थिक मंदी असूनही भारताचा आर्थिक वृद्धी दर 7 टक्क्यांच्या वर राहीलेला आहे.
प्रस्तूत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्म क्षेत्र अंतर्गत् परकीय व्यापार व्यवहार तोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.
Bharatiya Arthavyavastheche Paridrushya (1980-81 pasun)
-
-
भारतीय आर्थिक पर्यावरण
भारतीय आर्थिक पर्यावरण (Indian Economic Environment) या अभ्यासक्रमावर आधारित क्रमिक आणि संदर्भ पुस्तकात 6 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. पहिले प्रकरण व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण हे आहे. यात उद्योग व्यवसायासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत यांची सैद्धान्तिक आणि व्यावहारीक अशी मांडणी केली आहे. दुसर्या प्रकरणात उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणार्या कृषी आणि पायाभूत संरचना यांची मांडणी केली आहे. यात 2020 चे कृषी विधेयक, श – छअच ची चर्चा केली आहे. तिसर्या प्रकरणात 1991 चे औद्यागिक धोरण, औद्योगिक विकास व समस्या, खासगीकरण व निर्गुंतवणुकीकरण, मर्जर अँड टेकओव्हरची समर्पक मांडणी केली आहे. चौथ्या प्रकरणात औद्योगिक कामगार, कामगार कायदे, कामगार संघटना, औद्योगिक कलह, औद्योगिक आजारपण 2013 चा आजारी कंपन्या संदर्भातील कायदा, नादारी आणि दिवाळखोरी कोड यांची विस्तृत चर्चा केली आहे. पाचव्या प्रकरणात उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणार्या भाववाढ, नाणेबाजार, भांडवल बाजार, स्टॉक मार्केट आणि विदेशी भांडवलाची मांडणी केली आहे. सहाव्या प्रकरणात सरकारचे वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण, विदेश व्यापार धोरण, ऋएठअ आणि ऋएचअ यांचा आढावा घेतला आहे.
Bharatiya Arthik Paryavaran
-
भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)
देशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.
Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 1)
-
भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)
आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटक या आर्थिक व्यवहारांशी निगडित असतात. देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. देशातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल असेल तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ घडून येते. तर प्रतिकूल आर्थिक पर्यावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. सदर पुस्तकामध्ये आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, परिणाम करणारे घटक, अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाशी तुलना, कृषी पर्यावरण, शेतीची भूमिका, आव्हाने व विविध प्रवृत्ती, कृषी-औद्योगिक पर्यावरण, देशांच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका, औद्योगिक धोरण 1991, भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, आव्हाने, बँकिंग क्षेत्र, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती, प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास वगैरे महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.
Bhartiya Arthik Paryavan (Bhag 1)
-
भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 2)
‘भारतीय आर्थिक पर्यावरण’ यात सेवाक्षेत्रातील आर्थिक पर्यावरण यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विमा, बँकींग, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने, बँकिंग पर्यावरण यामध्ये बँक, बँकांची कार्ये, बँकेची बदलती रचना, खाजगी, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती आणि व्यवहार करण्याची प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास इत्यादी घटकांचा विचार केला आहे. त्यांचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू विचारात घेतलेला आहे. सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अलिकडील अद्ययावत सांख्यिकीय आकडेवारी व माहितीचे संदर्भ दिले आहेत. भारताची आर्थिक पाहणी, ठइख चे वार्षिक अहवाल, संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या माहितीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.
Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 2)
-
-
-
-
भारतीय वित्तीय प्रणाली
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या सर्वच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून ठरणारा ‘भारतीय वित्तीय प्रणाली’ या विषयावरील अतिशय सुलभ व सोप्या शब्दात मांडणी केलेली हे पुस्तक आपल्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे.
आधुनिक काळात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. तसेच बँकेत्तर वित्तीय संस्था सूक्ष्म वित्त पुरवठा आणि त्यांचे कार्ये तितकेच उपयुक्त आहे. देशाच्या औद्योगिकरणासाठी वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून वित्तीय संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणेबाजार आणि भांडवल बाजारात अनेक नवीन साधने प्रविष्ट झाली. अनेक संस्था नव्याने उदयास आल्या. यात भाडेपट्टा वित्त संस्थांपासून ते गृह वित्त पुरवठा संस्था, परस्पर निधी संस्था यांचा समावेश होतो. या बदलत्या परिस्थितीत नियंत्रणे सक्षम करण्यासाठी ‘सेबी’ सारख्या संस्था, क्रिसीलसारख्या पत मोजमापनाच्या श्रेणी जाहीर करणार्या यंत्रणांची गरज निर्माण झाली, आणि तशा तरतूदीही क्रमाक्रमाने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात केल्या गेल्या.
Bhartiya Vittiya Pranali
-
-
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून यात – 1) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिचय – महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल, 2) महाराष्ट्राची लोकसंख्या – महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर, महाराष्ट्रातील नागरीकरण, 3) महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था – राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, महाराष्ट्रातील पीक पद्धती व जलसिंचन, शेतीची उत्पादकता, विदर्भाच्या संदर्भात विशेष अध्ययन, 4) महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना – राज्याच्या औद्योगिक विकासाची वैशिष्ट्ये, लघुउद्योग व कृषिआधारीत उद्योग, महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्थेचा विकास, 5) महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र – महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राची भूमिका आणि कामगिरी, सेवा क्षेत्राचे प्रकार व वर्गीकरण, महत्त्व आणि समस्या, महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग इत्यादींचे विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
Maharashtrachi Arthvyavstha
-
महाराष्ट्राचे राजस्व
भारतीय राज्यघटनेने राज्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि कार्ये सोपविलेली आहेत. राज्यांनी कल्याणकारी राज्यांची संकल्पना स्वीकारल्यामुळे राज्यातील जनतेला जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याची जबाबदारी राज्याची आहे. राज्य सरकारे अर्थ संकल्पाच्या माध्यमातून या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक, सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्याचे एक साधन म्हणून देखील राज्याच्या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच राज्याच्या आर्थिक व सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला गेला आहे.
प्रस्तूत संशोधनात्मक ग्रंथात महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भातील पूर्वसंशोधन साहित्य, अर्थसंकल्पातील जमा-खर्च बाजू, अर्थसंकल्पातील विविध तुटींची स्थिती, राज्याची कर्ज स्थिती व शिल्लक कर्जाचे प्रमाण, राज्याचा विकास खर्च व विकासेत्तर खर्च, अर्थसंकल्पातील तुटीचे तुलनात्मक अध्ययन त्याचप्रमाणे केंद्रीय सरकारने नुकतीच लागू केलेली वस्तू आणि सेवा कर प्रणाली (जीएसटी) याविषयीचे सविस्तररित्या, अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात येवून काही ठळक निष्कर्षांचीही माहिती देण्यात आल्याने प्रस्तुत ग्रंथ हा सर्वसामान्य वाचक, अभ्यासक-संशोधक यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.Maharashtrache Rajasv (1991-92 to 2020-21)
-
मानव विकास (भाग-2)
पालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखीमेचे झाले आहे. आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात असा समज समाजामध्ये आढळतो. बालकाचा रंग, रुप, आकार, बौध्दिक क्षमता आपल्या आई वडिलाशी मिळते जुळते असते. वास्तविक शरीररचना व बाह्यवेषभूषेवरून चांगले अगर वाईट व्यक्तित्व ठरविणे दोषपूर्ण ठरेल. मानवी विकासाच्या विविध पैलूचा अभ्यास करतांना व्यक्तित्व इतरांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा व अभिवृत्ती यांना अनुसरून निश्चित होईल. व्यक्तिपरत्वे व्यक्तीत्व बदलत जाईल. नेतृत्व हे व्यक्तीसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
सदरील पुस्तकात अनुवंशिकता, वातावरण, विकासात यांची भूमिका, वातावरणाचे प्रकार, संयुक्त, विभक्त कुटुंबाची विकासात भूमिका, व्यक्तीमत्व संरक्षण यंत्रणा, स्वत्वकल्पना, प्रकार, नेतृत्व, प्रकार, गुण, बालकाच्या वर्तनसमस्या लैंगिक शिक्षण, महत्व, अपंग बालकाच्या शैक्षणिक अडचणी, किशोरावस्थेतील शारिरिक भावनिक बदल, सवयी, पालकत्व, प्रकार पालकबालक संबंध, महत्व, बालसंगोपनाच्या पद्धती, पालकांना आव्हान इ. विविध मुद्द्यांचा यथोचित समावेश केला आहे.Manav Vikas
-
मानव विकास व शासकीय कार्यक्रम
मानव विकासाचा एकंदरीत विचार करता, मानव विकास काय ते प्रथम पहायला हवे. मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास होय. मानवी जीवनाचा प्रारंभ गर्भधारणेपासून होतो. गर्भधारणा ते किशोरावस्था या काळात मानवाची वृद्धी व विकास होतो. विकास प्रक्रियेचा प्रारंभ मात्र गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत सुरु असतो. निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवसृष्टीमधील श्रेष्ठतम अशी सृजनात्मक प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हाच मनुष्य निर्मिती झाली. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. विकास प्रक्रियेवर आंतरिक तसेच बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो. बालवयात शारीरिक व मानसिक क्षमतांच्या स्वरूपात क्रमिक परिवर्तन होतात त्याला विकास म्हणता येईल. अशा प्रकारे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र हे मानव विकासशास्त्र होय असे म्हणण्यास हरकत नाही.
Manav Vikas V Shaskiya Karyakram