-
साहित्य समीक्षा शोध आणि बोध
Rs.275.00‘साहित्य समीक्षा शोध आणि बोध’ हा डॉ. अनंता सूर यांचा समीक्षाग्रंथ म्हणजे एकंदरीत बावीस कलाकृतींचा वाड्मयीन शोध आणि बोध आहे. हा वाड्मयीन शोध आणि बोध त्यांनी बारा काव्यसंग्रह, दोन कथासंग्रह, चार कादंबऱ्या आणि चार आत्मकथनांच्या अनुषंगाने घेतलेला आहे. डॉ. अनंता सूर हे नव्या पिढीतील कवी, कथाकार, आत्मकथनकार व कादंबरीकार असल्यामुळे त्यांच्या समीक्षेचा सूर बव्हंशी नव्वदोत्तरी साहित्यकृतींशी जुळलेला दिसतो.
मराठी समीक्षेचा आणि समीक्षकांचा महत्त्वाचा दोष म्हणजे ती समीक्षा एकसूरी आहे. त्यामुळे मराठीतील जुन्या पिढीतील समीक्षक नव्या पिढीतील कवी, लेखक काय लिहीत आहेत याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. डॉ. अनंता सूर यांनी या समीक्षाग्रंथात एकंदरीत या बावीस कलाकृतींवर सखोलपणे भाष्य केले आहे. त्या सर्वच्या सर्व कलाकृती खाउजा संस्कृतीचे अपत्य आहेत. खाउजा संस्कृती म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. ह्या तीन बाबींचा या ना त्या प्रकारे सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम झालेला आहे. डॉ. अनंता सूर यांचे हे समीक्षा लेख त्या त्या कलाकृतींवर उचित आणि चिंतनशील भाष्य करणारे आहेत. खाउजा संस्कृतीने समाजाची घडी बसवली की विस्कटवली ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या या कलाकृती आहेत. काळ कोणताही असो प्रत्येक काळात जो हतबल आहे तो कसा शोषित आणि वंचित ठरतो हेच यातील प्रत्येक समीक्षा लेखातून प्रत्ययास येते. आजच्या कालखंडावर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी हा समीक्षाग्रंथ मोलाची भूमिका बजावेल यात मला शंका नाही.– डॉ. सुहासकुमार बोबडे
ज्येष्ठ साहित्यिक, कराडSahityasamiksha : Shodh Aani Bodh
-
साहित्य संमेलने अनेक अध्यक्षीय भाषण एक
Rs.295.00आज साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे स्वरूप कोणत्याही एका समाज व वर्गापुरते सिमीत राहिलेले नाही. शहरांपासून तर खेड्यापाड्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या आचार-विचार आणि प्रवाहाची संमेलने भरविली जातात. ग्रामीण साहित्य, फुले-शाहू-आंबेडकरवादी साहित्य, संतसाहित्य, झाडीबोली साहित्य, खान्देशी साहित्य, आदिवासी साहित्य आणि जनसाहित्यासारखे नानाविध प्रवाह संमेलनामध्ये सामील होत आहेत. परंतु संमेलने कोणत्या गाव, प्रांत आणि देशातील आहे यापेक्षा या संमेलनातून खरा मानवतावादी विचार लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहचतो काय? यावर नव्याने विचारमंथन होण्याची गरज भासू लागली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि नव्या-जुन्या पिढींचा समावेश असलेली ही मराठी माणसाची साहित्य संमेलने आहे. अनेक संमेलनातील एकेका अध्यक्षीय भाषणाचा वेध घेणारा हा मौलिक संपादित ग्रंथ आहे. ही महाराष्ट्रातील निवडक अध्यक्षीय भाषणे शोधून काढण्याचे जिकिरीचे काम नव्या पिढीतील कवी-समीक्षक डॉ.अनंता सूर यांनी केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. मराठी साहित्यावर आणि साहित्य संमेलनांवर प्रेम करणार्या वाचकांसाठी हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल अशी आशा आहे.
Sahitya Samelane Anek Adhyakshiya Bhashan Eka