-
प्रकाशन, संपादन आणि लेखनकौशल्ये
Rs.225.00ग्रंथांचे म्हणजेच पुस्तकाचे मानवी जीवनात काय व किती महत्त्व आहे, हे आज सर्वांनाच माहित आहे. ग्रंथांना प्राचीन अशी दीर्घ परंपरा आहे. हस्तलिखित स्वरूपात आणि विविध विषयावर विविध प्रकारात होणारे ग्रंथलेखन छपाई कलेमुळे, सुबक, नेटके व देखणे रूप घेऊन अवतरले. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, ते आकर्षक छायाचित्र, गुळगुळीत, चमकदार कागदाने शोभिवंत बनले, कलात्मकतेने सजले आणि तशाच नव तंत्रज्ञानाच्या मार्गाने आज वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. लेखकाने केलेल्या ग्रंथ लेखनाइतकीच, त्याला पुस्तक रूप देऊन वाचकांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था म्हणून प्रकाशन व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची आहे. एवढेच नव्हे तर, अनेकांच्या सहभागाने ग्रंथ निर्मितीचे कार्य संपन्न करणारी ही प्रक्रिया एक ‘सांघिक प्रक्रिया’ आहे. म्हणजेच अनेक छोट्या व्यावसायिकांच्या, कलाकार व कारागिरांच्या सहकार्य, समन्वय व सुसंवादातून चालणारा असा ‘प्रकाशन व्यवसाय’ आहे.
-