-
सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र
Rs.350.00सार्वजनिक आयव्यय हा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन अभ्यास विषयांच्या सीमेवर असलेला विषय आहे. त्याचा एक पाय राज्यशास्त्राच्या दगडावर तर दुसरा पाय अर्थशास्त्राच्या दगडावर आहे. राज्यशास्त्र राज्यकारभार कसा चालवायचा हे सांगते तर राज्यकारभारातून समाजकल्याणात वाढ कशी करायची आणि त्यासाठी उत्पन्न कसे प्राप्त करायचे व ते कसे खर्च करायचे हे सांगते. सरकार कर आणि करेत्तर मार्गाने उत्पन्न प्राप्त करते. कर हे सक्तीचे अंशदान असते. त्याच्या बदल्यात करदात्याला कोणताही विशेष लाभ मिळत नाही. कर महसूल प्राप्त करण्याचे एक साधन आहे. याबरोबरच ते आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रमुख साधन आहे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पना स्विकारण्यात आली आहे. जनकल्याणासाठी सरकारला खर्च करावा लागतो आणि तो भागविण्यासाठी सरकारला महसूल प्राप्त करावा लागतो. खर्च आणि महसूल ताळमेळ बसत नसेल तर सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थभरणा यांचा अवलंब करावा लागतो.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाची भूमिका/महत्त्व, आयव्ययाचे सिद्धांत, कर, सार्वजनिक वस्तू आणि खासगी वस्तू, कराघात, करभार आणि करभाराचे संक्रमण, बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप, सार्वजनिक खर्च, भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्जाची परतफेड, अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा, विकसनशील अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरणाची भूमिका इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.Sarvajnik Ayavyayvache Arthashastra
-
सिंचन प्रक्रिया उद्योग व बाजार पेठ
Rs.130.00भारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे.
पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. सोबतच अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. अध्ययनासाठी बुलडाणा जिल्ह्याची निवड केली, कारण महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असणार्या विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा विविध अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. माँ जिजाऊंचे जन्मस्थान, जग प्रसिद्ध लोणार सरोवर, थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्ह्याचा काही भाग आजही प्रसिद्ध आहे. अशा जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. जेणे करून त्याची तुलना विदर्भ व महाराष्ट्राशी करता येईल. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे. असे असले तरी अध्ययनाचा आणि मांडणीचा प्रयत्न त्रुटीरहीत नाही याची जाणीव आहे. वाचकांनी त्रुटी व सदोषता निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती आहे.
Sinchan Prakriya Udyog V Bajar Peth