-
समकालीन भारतातील शिक्षण आणि लिंगभाव, विद्यालय व समाज
Samkalin Bharatatil Shikshan Ani Lingbhav, Vidhyalay V Samaj
-
समकालीन युद्धपद्धती
मानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. संरक्षणव्यवस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्ध ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली असून विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक तसेच सर्वांना सदरील पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.
Samakalin Yuddhapaddhati
-
समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.A.)
अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.Samagralakshi Arthashastra – SYBA
-
समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)
अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.Samagralakshi Arthashastra – SYBCOM
-
समाजशास्त्र : परिचय व मूलाधार
मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.
Samajshastra Parichay Aani Muladhar
-
समाजशास्त्राचा परिचय
समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. कोणत्याही समाजातील व्यक्तींचे पारस्पारीक संबंध कसे आहेत, त्या संबंधांचा मुलाधार कोणता आहे, ते संबंध परस्परांना प्रभावित करतात की नाही या बाबींचा अभ्यास समाजशास्त्रात करणे वर्तमानकाळाची गरज आहे. एकविसाव्या शतकाकडे झेपावणाऱ्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. या शोधांमुळे मानवाचे अर्थशास्त्र, आहारशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान विकसित झाले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणाऱ्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तंत्रशिक्षण, व्यवस्थापन, प्रशासन, उद्बोधन, संगोपन, समुपदेशन व जाणीवांचा जागर करणाऱ्या व्यक्तीस ह्या विषयाचे महत्व पटू लागल्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासकांची संख्यात्मक व गुणात्मक वाढ होत आहे. प्रस्तुत ग्रंथात जुन्या आणि नवीन सिद्धांत व संकल्पनांचा सुरेख संगम साधला आहे. मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचे यथायोग्य विश्लेषण केले आहे.
-
-
-
साधनसंपदा भूगोल व पर्यावरण
साधनसंपदा भूगोल व पर्यावरण हे पुस्तक भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भात एक सुस्पष्ट व संक्षिप्त मार्गदर्शन आहे. साधनसंपदा, भूगोल व पर्यावरण याबद्दलचे ज्ञान सुलभ आणि सुसंगत भाषेत विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले आहे. यामध्ये संसाधनांची संकल्पना, वर्गीकरण, संसाधन भूगोलाचा परिचय, वन आणि जल संपदा, भू संपदा, खनिज आणि ऊर्जा संसाधने, मानवी साधनसंपदा, संसाधने आणि आर्थिक विकास तसेच भारत आणि महाराष्ट्रातील विविध संसाधनांचे वितरण आणि उपयोग यावर व्यापक विवेचन करण्यात आले आहे.
प्रस्तुत पुस्तकात या सर्व घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट/सेट परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. -
सामान्य नकाशाशास्त्र
नकाशाशास्त्र ही एक कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवी अभिव्यक्ती आहे. सामान्यत: मानव ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा नकाशांचा उपयोग करीत असे, मानवाला भाषेचे ज्ञान अगोदर तो चिन्हे, संकेत, रेखाचित्रे व चित्रांचा उपयोग करीत असे. त्यामुळे नकाशाशास्त्र ही कला खूपच प्राचीन आहे हे स्पष्ट आहे.
जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करतांना मानव हा नकाशांचा वापर खूप पूर्वी पासून करीत आला आहे. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनेक लेण्या, प्राचीन स्थळे, शहरे, गावे यांचे निरीक्षण केले असता यात चिन्हे व रेखाचित्रांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. यावरून आपल्याला कल्पना येते की, प्राचीन काळातील लोकांनी नकाशाशास्त्रांची रचना केली, त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणावर करून नकाशाशास्त्राचा विकासही केला. आधुनिक काळात मानवाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचा विकास होत गेला व तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की, सामान्य माणूस ही नकाशाशास्त्राचा वापर करू लागला आहे. हवाई छायाचित्र, दूरसंवेदन, उपग्रह प्रतिमा, भौगोलिक माहिती प्रणाली व स्थान निश्चिती प्रणाली, संगणक, मोबाईल, टेलिव्हीजन यावर नकाशाशास्त्राचा वापर मानव केल्याशिवाय रहात नाही.
Samanya Nakashashastra
-
सामान्य नकाशाशास्त्र
भूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून नकाशाशास्त्र ओळखली जाते. नकाशा हा भूगोलाचा आत्मा असतो. प्राचीन काळापासून नकाशाशास्त्राचा उपयोग व्यवहारात केला जातो. भूगोलशास्त्राप्रमाणेच नकाशाशास्त्र देखील गतिमान स्वरुपाचे आहे. विवि. कालखंडात नकाशाशास्त्राचा विकास होत आलेला असून आजच्या आधुनिक काळात नकाशाशास्त्राचे स्वरूप डीजीटल झालेले आहे.
मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासूनच नकाशाशास्त्राचा देखील टप्प्याटप्प्याने क्रमशः होत आलेला आहे. भारतातदेखील नकाशाचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे. परंतु तत्कालीन नकाशाचे स्वरूप हे उद्दिष्टापुरते व अवगत ज्ञानाएवढेच मर्यादित होते. नकाशा तयार करण्याच्या तंत्रात अचूकपणा नव्हता. तरीदेखील भारतीय नकाशाशास्त्राला मोठा इतिहास होता. आधुनिक कालखंडात इ.स. अठराव्या शतकात ब्रिटीशांच्या अखत्यारित भारतीय नकाशाशास्त्राचा विकास झालेला दिसून येतो. भारताचा पहिला अचूक नकाशा इ.स. 1752 मध्ये तयार करण्यात आला. इ.स.1769 मध्ये लॉर्ड क्लाईव्ह यांनी बंगालचे सर्वेअर जनरल म्हणून नियुक्त केलेले जेम्स रेनेल यांनी त्रिकोणीकरण पद्धतीवर आधारित भारताचा अचूक नकाशा तयार केला.
इ.स.1905 मध्ये भारत सरकारच्या सर्वेक्षण विभागाने भारताचे 1 इंचास 1 मैल या प्रमाणावरील 3000 नकाशे तयार केले. हे नकाशे भारतीय स्थलनिर्देशक नकाशे म्हणून ओळखले जातात. असे नकाशे तयार करतांना त्यामध्ये अनेक सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर करण्यात आलेल आहे. पुढे जाऊन ब्रिटीश तसेच मेट्रीक मापन पद्धतीत या नकाशांची अधिकाधिक उत्तम निर्मिती होऊ लागली. भारतीय अवकाश संशोधन संस्थाच्या माध्यमातून अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (दूर संवेदन) उपग्रह प्रतिमांद्वारे आधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण नकाशांची निर्मिती केली जात आहे.
Samanya Nakashashastra
-
साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य)
साहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या सार्वभौम जगाशी आपला नीटसा परिचय होणार नाही. हे लक्षात घेतले तर ‘साहित्यविचार’ या विषयाचे आजही असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. याची जाण बाळगणारे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रभाकर जोशी यांनी सदर पुस्तकाचा घाट घातला आहे. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार’ या विषयासंदर्भात मौलिक लेखन करणार्या दिवंगत प्रा. ब. लु. सोनार या आपल्या गुरुंच्या उपलब्ध नसणार्या पुस्तकांना नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यानिमित्ताने ते करीत आहेत. पण संबंधित विषयातील स्वतःच्या अभ्यासदृष्टीतून झालेले लेखनही त्यांनी येथे समाविष्ट केलेले आहे. पूर्वसूरींचे कृतज्ञ स्मरण करतानाच नवागतांना उजळ वाट दाखविण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. साहित्याच्या स्वयंपूर्ण अस्तित्वाचे मर्म जाणून घेऊ इच्छिणार्यांना या पुस्तकाचा लाभ होईल असा विश्वास वाटतो.
– आशुतोष पाटील
Sahityavichar (Bharatiya Ani Pashchattya)
-
-
सुगम काव्यशास्त्र
काव्यशास्त्र की सुदीर्घ परम्परा है। इसका इतिहास लगभग दो हजार वर्षों में फैला हुआ है। ईसा पूर्व दूसरी-तीसरी शताब्दी से लेकर सत्रहवीं शताब्दी तक भारतीय तथा पाश्चात्य काव्यशास्त्रीय चिंतन की परंपरा पल्लवित और विकसित होती रही। जीवन का प्रवाह अनन्त है। अनादि काल से आज तक मानव जीवन के इस अनन्त प्रवाह ने अपने भाव और बुद्धि प्रवाह की असीमितता को मापने-जोखने के लिए अनवरत अध्यवसायपूर्ण कर्म के माध्यम से अनेक प्रकार के घाट निर्मित किए है। शास्त्र, साहित्य, कला, ज्ञान, विज्ञान कोई भी ऐसा क्षेत्र नहीं है कि जिसे मानव के भाव और बुद्धि से संचालित कर्म ने अपने स्पर्श द्वारा अलौकिक एवं उपयोगी न बना दिया हो।
प्रस्तुत ग्रंथ में चिंतन की इस सुदीर्घ परम्परा के प्राय: सभी महत्वपूर्ण मोडों को समेटने का प्रामाणिक प्रयास किया गया है। साथ ही भारतीय तथा पाश्चात्य काव्यशास्त्र के महान आचार्यो से लेकर बीसवी शताब्दी के आलोचकों के प्रमुख काव्य-सिद्धांतों का विवेचन-विश्लेषण किया गया है। नि:संदेह यह ग्रंथ छात्रोपयोगी बनाने की दिशा में तथा जिज्ञासु छात्रों को दृष्टिगत रखते हुए लिखा गया है।
Sugam Kavyashastra
-
-
स्थूल अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवर विचार करणारे अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. या शास्त्राच्या शाखेत एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण उत्पादन पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवरचा अभ्यास केला जातो.
सदरील पुस्तकात स्थूल पातळीवरील उत्पन्न, उत्पादन, रोजगार, मागणी, पुरवठा, बचत, गुंतवणूक पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार, विनिमय दर इ. बाबींची सखोल व विस्तृत मांडणी तसेच स्थूल स्वरुपाच्या आर्थिक समस्या, स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत, विविध संकल्पना, पैशाची मागणी, पुरवठा उत्पादन, रोजगार, सामान्य किंमत पातळी इ. घटकातील संबंध व संतुलन तसेच या सर्व समग्रावर परिणाम व त्यांच्यात बदल घडवून आणण्यास जबाबदार असणारे सर्व घटक सर्वांना सहज समजतील अशा पद्धतीची मांडणी अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे.
Sthul Arthashastra
-
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व लेखन
21 वे शतक हे स्पर्धेचे युग म्हणून ओळखले जाते. जिथे स्पर्धा म्हटली तिथे अचूक अभ्यासक्रम समजून घेणे, संदर्भ ग्रंथ, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव अशा गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते.
आपल्या देशाचा विचार केला असता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे. त्याप्रमाणात नोकर भरतीची गरज वाढते; तसेच विविध विभागातील पदे सेवानिवृत्तीमुळे व नैसर्गिक वाढीमुुळे रिक्त होतात. त्यामुळे दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षांमार्फत विविध विभागात नोकर भरती केली जाते. याठिकाणी प्रचंड स्पर्धा असते. अशा या स्पर्धेमध्ये अचूक संदर्भ ग्रंथांची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. कारण स्पर्धेत जिंकायचे असेल तर तुमच्याकडे योग्य संदर्भ ग्रंथ असणे महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व असते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर एम.पी.एस.सी.राज्य सेवा (मुख्य परीक्षा) व पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/मंत्रालय सहायक (मुख्य परीक्षा) तसेच तलाठी, ग्रामसेवक, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (ढएढ), जिल्हा निवड समिती अंतर्गत वरिष्ठ/कनिष्ठ लिपिक भरती, सरळ सेवा – समाज कल्याण निरीक्षक, पाटबंधारे निरीक्षक, वनविभाग, पोलीस भरती, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नेट (मराठी), सेट (मराठी) इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. मराठी भाषा व मराठी व्याकरण या विषयांचा अभ्यास वरील परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आपली मातृभाषा मराठी आहे. आपण दररोज मराठी ऐकतो, बोलतो म्हणजे आपल्याला मराठी व्याकरण येतेच असे नाही, तर त्यासाठी मराठी व्याकरणाचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो.