• भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते 1857)

    प्राचीन काळापासून भारताचे पाश्चिमात्य देशांशी व्यापारी संबंध होते. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात भारतीय समाज एकसंघ नव्हता तो अनेक गटात विखुरलेला होता. निरनिराळ्या जातींच्या गटात रोटी-बेटी व्यवहार बंद होते. तरी देखील आर्थिक क्षेत्रात भारत संपूर्ण जगात संपन्न राष्ट्र गणले जात होते. भारतातील राजकीय स्थिती अनुकूल असल्याने इ.स. 1526 मध्ये बाबरने सुलतान इब्राहीम खान लोदीचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुगलांच्या सततच्या आक्रमणाने भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली. ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर 1757 ते 1857 या काळात त्यांनी अनेक बदल केले. मात्र प्रशासकीय व कायदेशीर सुधारणा राबवत असतांना आपल्या स्वार्थाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर पन्नास वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे समीकरण बिघडून हजारो लाखो कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाची अक्षरक्ष: वाताहत झाली. याची परिणती 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाली, पण त्यात अपयश आले.
    प्रस्तुत पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे.

    Bharatacha Itihas – Ad 1750 to 1857

    – डॉ. गोकूळ पाटील

    275.00
    Add to cart
  • भारताचा भूगोल

    भारत हा एक प्राचीन संस्कृती व वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा लाभलेला महान देश आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. भारत हा विशाल खंडप्राय देश असून विविधतेने नटलेला आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय, दक्षिणेस विस्तृत हिंदी महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस अरबी समुद्र शिवाय अंतर्गत भागातील भूरचनेतील विविधता यामुळे भारताचे हवामान वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात जगातील बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानाचे आविष्कार पाहायला मिळतात. पश्चिम आशिया व पूर्व आशियाच्या मध्यभागात भारत स्थित असून हिमालय पर्वताच्या दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरलेला भारत हा आशिया खंडाचा एक उपखंड समजला जातो. भारताचा लोकसंख्या बाबतीत जगात चीन नंतर दूसरा क्रमांक लागतो. भारतातील खनिज व शक्ती साधनसंपत्तीचे वितरण विषम झालेले आहे. भारताचे शेजारील देशांदरम्यान भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत.

    Bharatacha Bhugol

    275.00
    Add to cart
  • भारताची राष्ट्रीय सुरक्षा

    उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्‍या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी झालो आहोत.
    राष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.

    Bharatachi Rashtriya Surksha

    250.00
    Add to cart
  • भारतातील प्रवास आणि पर्यटन

    प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
    प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.

    Bharatatil Pravas And Paryatan

    250.00
    Add to cart
  • भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय

    वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्‍या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Bharatatil Vastusangrahalyancha Parichay

    350.00
    Add to cart
  • भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)

    भारताचा विदेश व्यापार प्राचीन व अर्वाचीन काळापासून अनेक देशांशी चालत आलेला आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. गोळा झालेला निधी कर्ज, उधारी, गुंतवणूक रूपाने उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंमत स्थैर्य आणि बँकींग क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या वस्तू किंवा सेवांचा उत्पादनखर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो, अशा वस्तू उत्पादनात श्रम विभागणी आणि विशेषीकरण केले जाते, श्रम विभागणी आणि विशेषीकरणातून उत्पादनात वाढ होते. जागतिक पातळीवर जगातील बहुतांश देशांनी 1970 च्या दशकापासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आर्थिक सुधारणांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतीय वित्तीय प्रणाली, बँकिंग, विदेश व्यापार व व्यवहारतोल, जागतिकीकरण, संघीय वित्तीय प्रणाली, सरकारचा महसूल, खर्च, कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा इ. मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.

    Bharatiya Arthavyavastha

    425.00
    Add to cart
  • भारतीय अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती (1990-1991 पासून)

    1947 नंतर भारतात आर्थिक नियोजनामुळे विकासाला सुरवात झाली. कृषी उद्योग व सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हायला लागले परंतु काही चुकीच्या निर्णयांमुळे, राजकीय धोरणकर्त्यांमुळे 1990 मध्ये देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला. जुलै 1991 मध्ये जागतिक बँकेच्या रेट्यामुळे आर्थिक सुधारणांना सुरवात करावी लागली. आर्थिक सुधारणामुळे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू झाली. भारतात आर्थिक प्रगतीच्या दिशेने आर्थिक बदलांची प्रक्रिया सुरू झालेली असून आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून जगातील तिसर्‍या क्रमांकाचा एक सामर्थ्यशाली देश अशी गणना होऊ लागली आहे. सध्या सत्तेत असलेल्या ‘मोदी इकॉनॉमिक्स’मुळे भारताची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू झालेली असून 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पाहात आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या, जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास, कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्यक्षेत्र अंतर्गत परकीय व्यापार, व्यवहारतोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती, वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. अर्थविषयक विविध मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.

    Bhartiya Aarthvyavsthechi Saddyasthiti (1990-91 Pasun)

    350.00
    Add to cart
  • भारतीय औद्योगिक अर्थशास्त्र

    भारतात औद्योगिक विकासाचा खरा पाया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत रचला गेला. आज भारतीय औद्योगिक क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. भारताचा औद्योगिक विकास हा यंत्रनिर्मित वस्तू पर्यंत मर्यादित नसून अभियांत्रिकी, सेवा उद्योग असा विस्तारला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतातील औद्योगिकीकरण, भारतातील सार्वजनिक व खाजगी उद्योग क्षेत्र, औद्योगिक रुग्णता, प्रादेशिक औद्योगिक असमतोल, भारतीय उद्योगांचे नियमन, भारतीय उद्योगांवरील विनियमनाचा भाग म्हणून खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, भारतीय श्रमिक, त्यांची वैशिष्टे, उत्पादकता, वेतन, सामाजिक सुरक्षा, कामगार कल्याण, कामगार संघटना या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा विकास किंवा प्रगती आणि समस्यांचे योग्य आकलन व्हावे म्हणून सांख्यिकीय माहितीचा वापर केला आहे.

    410.00
    Add to cart
  • भारतीय राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.

    Bhartiya Rajkiya Vicharvant

    235.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटना आणि राजकारणाची ओळख

    भारतीय राज्यघटनेची निर्मिती 1946 ते 1950 या कालखंडात घटना समितीकडून झालेली असली तरी राज्यघटना निर्मिती पूर्वी ब्रिटिश राजवटीने केलेल्या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीपूरक वातावरण भारतात निर्माण होण्यास प्रारंभ झालेला होता. राज्यघटना निर्मितीवेळी प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकास साध्य करणे आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेचे ध्येय मानले गेले. नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क प्रदान करताना मार्गदर्शक तत्त्वांचेही आरेखन केले गेले. भारतीय घटनेद्वारा नागरिकाचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करताना भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्तीदेखील केली गेली. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने देशाची सत्ता कार्यकारी मंडळाकडे आली. भारताचे कार्यकारी मंडळ सामुहिकरीत्या संसदेला जबाबदार असते. लोकशाहीची संस्थात्मक चौकट यशस्वी व गतिमान बनविण्यासाठी न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ही महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. हे निकोप लोकशाहीचे प्रमुख अंग मानले गेले.

    Bhartiya Rajyaghatana Aani Rajkaranachi Olakh

    395.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटना शासन आणि राजकीय व्यवस्था

    26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. घटनाकारांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये विभागणी करतानाच मूलभूत अधिकार व हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचेही समावेशन केले गेले. अधिकार-कर्तव्ये परिभाषित करतानाच भारतीयांच्या भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्ती देखील केली गेली. राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असले तरीही पंतप्रधानांचे महत्त्व ठळकपणे दिसून येते. निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केलेल्या निवडणूकांमध्ये मतदानाद्वारे निवड झालेल्या लोकप्रतिनिधींकडून मंत्रिमंडळाची नियुक्ती होते. लोकसभेमध्ये बहूमत असेपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. याप्रकारे लोकशाहीत जबाबदारीचे तत्त्व विकसित झाल्याने कायदेमंडळांकडून कायदे केले जातात, कार्यकारी मंडळाकडून कायद्यांची अंमलबजावणी होते आणि न्यायमंडळ अंमलबजावणी प्रक्रियेची पाहणी करते म्हणजे न्याय देते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांसाठी हे आवश्यक ठरते.

    Bharatiya Rajyaghatana – Shasan ani Rajkiya Vyavastha

    375.00
    Add to cart
  • भारतीय राज्यव्यवस्था

    भारतीय राज्यव्यवस्था या पुस्तकात केंद्रीय कार्यकारी मंडळ, केंद्रीय कायदेमंडळ, राज्य कार्यकारी मंडळ, राज्य कायदे मंडळ, भारतीय न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया या विषयी विस्तृत माहितीचा देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्थेशी निगडीत अनेक घटक पदवी, पदवीत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नेट/सेट परीक्षेतील अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहेत. म्हणून उपरोक्त पुस्तकाची रचना विद्यापीठीय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षा या दोन्हीसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल या हेतूने केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यव्यवस्थेशी निगडीत संकल्पना समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासू प्राध्यापक व विद्यार्थ्यांना अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल.

    250.00
    Add to cart
  • भारतीय लष्करी इतिहास

    भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अतीप्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैशिक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. प्रस्तुत ग्रंथात युद्धविषयक निरनिराळे घटकांचे योग्य विश्लेषण करून, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    150.00
    Add to cart
  • भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)

    मुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.

    150.00
    Add to cart
  • भारतीय समाज संरचना व बदल

    Bharatiya Samaj Sanrchna V Badal

    280.00
    Add to cart
  • भारतीय संरक्षण यंत्रणा आणि संघटना

    देशाचे संरक्षण आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी जशी सैन्यदलाची गरज असते. त्याचप्रमाणे सैन्याला दिशा देण्यासाठी संघटनेची गरज असते आणि ही संघटना उत्तम अशा प्रशासनाचा मूलभूत स्वरूपाचा पाया समजला जातो. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे पद देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
    भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे आणि अंतर्गत कलहापासून राष्ट्रहित जोपासणे ही तिन्ही सेनादलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल या तिघांचीही भूमिका स्वागतार्ह अशी आहे. यातील एकाही दलाचा निर्णय चुकल्यास राष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागते. कुशलता आणि चातुर्य लाभलेल्या संरक्षक घटकास चांगल्या प्रकारे प्रशिक्षणही प्राप्त झालेले असते. भारताच्या तिन्ही दलांमध्ये चांगल्या लष्करी संघटनेसाठी उद्देश, सहकार्य, लवचिकता, समतोलपणा, काटकसर, विकेंद्रीकरण, प्रयत्नाची एकता आणि अचूकपणा या तत्त्व समरसून भरलेले आहे असल्यामुळे आज तिन्ही दले भारताची मान जगात उंचावताना दिसून येते. सावध भूमिका घेतानाच वेळप्रसंगी आक्रमकपणाचेही दर्शन तिन्ही दलांनी विविध प्रसंगी घेतलेल्या भूमिकांवरून दिसून येते.

    275.00
    Add to cart
  • भारतीय संविधान मूलभूत तत्त्वे आणि स्वरूप

    संविधान म्हणजे एक देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ. ते राज्याच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, व न्यायमंडळ यांची स्थापना करतो, त्यांच्या अधिकार व कार्ये स्पष्ट करतो, व त्यांची मर्यादा ठरवतो. संविधान जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे आणि त्यात सुसंगत व न्यायसंगत शासनाची रूपरेषा असते.
    लोकशाहीत, राज्यघटनेचा आधार म्हणजे जनता स्वसंविधान तयार करते आणि विविध शासन अंगांना अधिकार प्रदान करते. संविधान हा संस्थात्मक आरसा आहे, जो समाजाच्या विविध स्तरातील मूल्यांचे प्रतिबिंब असतो. त्याच्या अंमलबजावणीवर आणि न्यायालयीन निर्णयांवर संविधानाचा प्रभाव आहे.

    450.00
    Add to cart
  • भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी

    आजच्या काळात भारत आणि जगातील अनेक देशांच्या लष्करी पद्धतींमध्ये ग्रीक-रोमन युद्धपद्धतीचा प्रभाव आहे. एकविसाव्या शतकात युद्धतंत्रात माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध आधुनिक शस्त्रे यांचा समावेश झाला आहे, ज्यामुळे भारतीय सेनादलांच्या घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
    प्राचीन भारतात संरक्षण आणि युद्धकला प्रगल्भ होती. रामायण, महाभारत आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये याबाबतच्या महत्त्वाच्या विचारांची माहिती आहे. दुर्दैवाने, भूतकाळातील या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताला अनेक वेळा पराभव भोगावे लागले.
    समरांगण सूत्रधारासारख्या ग्रंथांमधून प्राचीन भारतीय सैन्याची रचना, युद्धकलेची तत्त्वे आणि तंत्रज्ञान समजून घेता येते. भारताच्या संरक्षण यंत्रणेची रचना सरंजामशाहीवर आधारित होती, ज्यामुळे समाजातील इतर घटक संरक्षण कार्यात कमी सहभागी झाले.
    भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी या पुस्तकात विद्यार्थ्यांना सेनादलांच्या नावीन्यपूर्ण बाबी, भारतीय लष्करी दलांशी संबंधित वस्तुस्थिती आणि तथ्ये, आधुनिक युद्धाच्या आवश्यकतेनुसार होणारे बदलही याविषयी माहिती तसेच राष्ट्रप्रेमाचे कर्तव्य लक्षात घेऊन, राष्ट्ररक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना सेनादलांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

    170.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!

    Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)

    295.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)

    भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.

    Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)

    365.00
    Add to cart
  • भाषिक संप्रेषण : एक कला

    Bhashik Sanpreshan : Eka Kala

    150.00
    Add to cart
  • भौगोलिक माहिती प्रणाली

    भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक घटकांच्या अभ्यासात एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करते. पृथ्वीवरील विस्तृतपणे पसरलेल्या भौगोलिक घटकांचे सर्वेक्षण, वर्गीकरण, सांख्यिकी मांडणी व तिचे विश्लेषण यांचे एक सर्व समावेशक सादरीकरण भौगोलिक माहिती प्रणाली मुळेच सहज सरळ व सोपे बनते. भौगोलिक माहिती प्रणाली या पुस्तकाचे लेखन करतांना आमचा प्रयत्न हाच राहिला आहे की, भौगोलिक माहिती प्रणाली सारख्या गुंतागुंतीच्या विषयाला सोपा, मनोरंजक, व्यवस्थित व क्रमबद्ध स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
    सदर पुस्तकात भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, भौगोलिक माहिती प्रणाली सांख्यिकी रचना, भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन यात विविध उपघटकांना उदाहरण व आकृतीसह एक नवीन रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Bhaugolik Mahiti Pranali

    125.00
    Add to cart
  • भौगोलिक माहिती प्रणाली

    भौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. अनेक विद्याशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करुन तयार केलेले तंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वाची भौगोलिकदृष्ट्या माहिती तंत्रज्ञानाबाबतची जवळीकता निर्माण झाली आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची विलक्षण क्षमता व सहज वापरण्यायोग्य कार्यप्रणाली यामुळे हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या तंत्राचा वापर अनेक क्षेत्रात नियोजन, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व अनेक दैनंदिन व्यवहारासाठी वाढत आहे. पर्यावरणीय, परिस्थिकीय, वातावरणीय आणि अनेक जैविक घडामोडी मध्ये जीआयएसचा वापर होत आहे.
    भौगोलिक माहिती प्रणालीच्या अनेक आज्ञावली आहेत. काही आज्ञावली मोफत उपलब्ध आहेत तर काही विकत घ्याव्या लागतात. गरजेनुसार आज्ञावलींंचा शोध घेवून त्यांचा सर्वसामान्यपणे वापर करता येतो. भौगोलिक विश्लेषणासाठी जीआयएस आज्ञावली वापरल्या जातात.
    भौगोलिक माहिती प्रणाली अवकाशिक व गुणविशेष माहितीवर कार्य करते. या प्रणालीमध्ये जाळी सांख्यिकी व सदिश सांख्यिकी प्रतिमानात सांख्यिकी संकलित केली जाते.
    भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन विविध क्षेत्रात प्रभावीपणे केले जाते.

    Bhaugolik Mahiti Pranali

    110.00
    Add to cart
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1707)

    प्राचीन काळापासून भारतावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण व हूण इ. अनेक परकीय जमातींनी आक्रमण केले. भारतीय संस्कृतीने या सर्वांना आपल्यात समाविष्ट करुन घेतले. परंतु 12 व्या शतकात आलेल्या मुसलमान आक्रमकांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी आपले वेगळेपण शेवटपर्यंत कायम राखले. इ.स. 1200 ते 1800 हा 600 वर्षांचा कालखंड मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सुलतानशाही कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता स्थापन झाली होती. सुलतान तुर्क व अफगाण वंशातील होते. साधारणपणे याच कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. बाबरने 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मोगल राजघराण्याची स्थापना केली. हा सर्व कालखंड अत्यंत धामधुमीचा होता. सतत लढाया होत असे. सामान्य माणसाचे जीवन अत्यंत हलाखीचे होते.प्रस्तुत पुस्तकात मध्ययुगीन व्यापार, उद्योगधंदे आणि कृषी जीवन, सामाजिक-धार्मिक जीवन इ. मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे.

    Madhyayugin Bharatacha Itihas – Ad 1206 to 1707

    295.00
    Add to cart
  • मराठी व्याकरण व लेखन

    मराठी साहित्याच्या अभ्यास – संशोधन क्षेत्रात भाषिक अभ्यासाचे प्रमाण सातत्याने अल्पच आहे. मराठीचा अभ्यास म्हणजे केवळ मराठी साहित्याचा अभ्यास अशी दृढ होत गेलेली वृत्ती यास कारणीभूत आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अभ्यासाचे विस्तृत क्षेत्र नेहमीच परिघावर राहिलेले दिसते. अभ्यासक्रमातही भाषिक दृष्टीने केल्या जाणार्‍या अभ्यासांना फारशी जागा नसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यात पुन्हा भाषेचे लिखित रूप ज्या व्यवस्थेवर भक्कमपणे उभे असते त्या व्याकरणाचा गांभीर्यपूर्वक केल्या जाणार्‍या अभ्यासाचे दुर्भिक्ष भयानक स्वरूपाचे आहे. शालेय पातळीवर निर्माण होणारी मराठी व्याकरणाची नावड आणि पदवी पातळीवरील अभ्यासात त्याकडे केलेले दुर्लक्ष आज प्रकर्षाने जाणवत आहे. मराठी व्याकरण हा विषय आता केवळ स्पर्धा परीक्षांपुरता उरला आहे की काय? अशी शंका मनात यावी अशी एकंदर परिस्थिती आहे. याबद्दल दिलासा देणारी बाब सदर पुस्तकामुळे घडत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. नव्या पिढीतील एका अभ्यासकाने मराठी भाषेचे मर्म जाणून घेण्याच्या भूमिकेतून घेतलेला व्याकरणाच्या आकलनाचा आणि प्राप्त आकलनातून व्याकरणविषयक मर्मदृष्टी रुजविण्याचा घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे. व्याकरणिक संकल्पना, समर्पक उदाहरणांसह त्यांचे स्पष्टीकरण आणि आकलनाची पडताळणी करून घेण्यासाठी लगेच दिलेले प्रश्र या मांडणीतून मराठी व्याकरण सुकर व नेटक्या पद्धतीने समजावून सांगणारे हे पुस्तक आहे.

    – आशुतोष पाटील

    Marathi Vyakaran V Lekhan

    150.00
    Add to cart
  • मराठीचा भाषिक अभ्यास

    इ.स.दहावे शतकात यादव काळात मराठी भाषा-संस्कृतीची जडण-घडण झाली. यादव काळातील या मराठी भाषेचा ‌‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशा शब्दात गौरव केला जातो. मराठीचे हे वैभव कालिक, राजकीय स्थित्यंतरांनी नष्ट झाले. बहामनीकाळात मुस्लिम राजवट व त्यांची ‌‘उर्दू-फारसीमिश्रित हिन्दी’ या भाषासंपर्कामुळे मराठी भाषा भ्रष्ट झाली. शिवकाळात तीने आपले पूर्वरुप प्राप्त केले. पेशवेकाळ व आंग्लकाळातील अन्यभाषिकांच्या संपर्कात तिचे स्वरूप बदलत गेले. आजच्या मराठी प्रमाणभाषेचा या स्थित्यंतराशी संबंध आहे.
    मराठी भाषेची पूर्वपीठिका, उत्पत्ती कालखंड, निश्चितीची साधने, त्यासंदर्भातील वैद्य-गुणे वाद, भाषा उत्पत्तीचे सिद्धान्त व भाषाकुल संकल्पना, मराठी भाषेवर झालेला अन्य भाषा परिणाम, प्रमाणभाषा व बोलीभाषा सहसंबंध, मराठीचे शब्दभांडार, मराठीचे कालिक भेद व प्रान्तिक भेद, भाषा आणि लिपी इ. घटकांचा संबंध ‌‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या अभ्यासक्षेत्राशी निगडीत आहे. एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांचा समावेश आहे. म्हणूनच विद्यापीठीय मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. प्रस्तुत पुस्तकात या विषय घटकांच्या संदर्भात मान्यवर अभ्यासकांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेतला आहे. नव्या पिढीतील मराठी अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना व भाषाभ्यासकांना अभ्यासपूर्ण विवेचनासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन!

    – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी

    Marathicha Bhashik Abhyas

    275.00
    Add to cart
  • मराठ्यांचा इतिहास

    सतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी एकत्र करून त्यांच्यापुढे स्वराज्याची कल्पना मांडली. जे मराठा सरदार प्रारंभी या कल्पनेच्या विरोधात होते, त्यांना त्यांनी पराजित करून धडा शिकविला. अफजलखान, शाहिस्तेखान यासारख्या प्रतिष्ठीत सरदारांना पराभूत केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठ्यांच्या सत्तेचा हिंदुस्तानात लौकिक पसरला.

    395.00
    Add to cart
  • महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रमुख संकल्पना

    महात्मा गांधी हे आदर्शवादी व युगप्रवर्तक नेते होते. त्यांनी राजकारणाला व्यावहारीक अशी नवी अधात्मवादी दृष्टी दिली. अन्यायाचा प्रतिकार सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. गांधीजींनी ग्रामपातळीपासून ते देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात, समाजकारणात शुद्धीकरणाला महत्व दिले. त्यांचे सामाजिक कल्याण, अस्पृश्यता व जातीय ऐक्य, महिला सबलीकरण, शिक्षणासंबंधीचे विचार तसेच आर्थिक क्षेत्रात भांडवलवाद व नागरीकरण, आरोग्य आणि स्वच्छता तसेच शेतकरी, कामगार, आदिवासी व अल्पसंख्याकांसंबंधी विचार हे अद्वितीय विचार आहेत.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतिप्रवाहाचे कृतिशील विचारवंत व नेते होते. 20व्या शतकातील महान विचारवंत, प्रकांड कायदेपंडित, थोर समाजसेवक, दूरदर्शी राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. डॉ. आंबेडकरांचे जीवन-कार्य अलौकिक व अनन्यसाधारण असून, आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. उत्तम प्रशासक, थोर बुद्धिवादी व सिद्ध हस्तलेखक, ग्रंथकार, कुशल संघटक, दलितांचे महान नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच सामाजिक विज्ञानाच्या प्रमुख ज्ञानशाखांतील तत्वचिंतक अशा विविध क्षेत्रांतील त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी केलेले समाजकारण, राजकारण, अर्थकारण, राज्यघटना, शिक्षण या विषयावरील मूलगामी चिंतन, विश्लेषण व कार्य भारतीयांना प्रेरक, पूरक व मार्गदर्शक असे आहे.
    महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन महापुरुषांनी आपल्या विचार व कृतीने जनमानसात नवजागृती निर्माण करून समताधिष्ठीत मूल्यांची जपवणूक करून आधुनिक भारताची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

    250.00
    Add to cart
  • महाराष्ट्राच्या प्रशासनाची ओळख

    महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संयुक्त महाराष्ट्राची एक फलश्रुती आहे. ‘महाराष्ट्र प्रशासन’ या संबंधीचे अध्ययन हे सामाजिक शास्त्रात मूलभूत स्वरूपाचे आहे. ‘महाराष्ट्र’ ह्या शब्दाच्या माध्यमातून बहुविध स्वरूपाची चर्चा व तिचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया गतिशील स्वरूपाची आढळते. उपरोक्त विवेचनात महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती प्राप्त होते. प्रत्येक जिल्हा हा अनेक क्षेत्राच्या दृष्टिने उपयुक्त स्वरूपाचा आहे, पर्यावरण, इतिहास, सामाजिक संदर्भ, सहकार, उद्योग, राजकीय पार्श्वभूमी व नेते, वेगळेपण, याबाबत प्रत्येक जिल्ह्यांचे निराळेपणा वा वैशिष्ट्ये आढळतात.

    सदरील पुस्तकात महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, ठळक वैशिष्ट्ये, पुनर्रचित प्रशासकिय विभाग आणि जिल्हे, राज्य सचिवालय, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, ग्रामीण स्थानिक प्रशासन, शहरी स्थानिक प्रशासन – नगरपालिका, महानगरपालिका, इतर शहर स्थानिक संस्थाचे प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, आदिवासी विभाग विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, म. फुले, आण्णासाहेब पाटील, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास महामंडळ, विकेंद्रीकरण वगैरे प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. सदरील पुस्तकातील मांडणी ही स्पष्ट व सुबोध भाषेत करण्यात आली आहे.
    प्रस्तुत पुस्तक नेट-सेट, युपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षार्थ्यांना तसेच वाचक, अभ्यासू आणि जिज्ञासूंनासुद्धा उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    Maharashtrachya Prashasanachi Olakh

    395.00
    Add to cart
  • मागणी-पुरवठा फलनाचे अर्थशास्त्र

    ‌‘मागणी-पुरवठा फलनाचे अर्थशास्त्र’ या ग्रंथात यात सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र, त्याचे महत्त्व व मर्यादा, उत्पादनाशी संबंधीत संकल्पना, फलन संबंध आणि बाजार यंत्रणा/अर्थव्यवस्था या घटकांचा समावेश आहे. दुसऱ्या युनिटमध्ये मागणी, मागणीचा सिद्धान्त, व्यक्तिगत व बाजार मागणी वक्र, मागणीची लवचिकता, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, मागणीचा पूर्व अंदाज यांचा समावेश आहे. तिसऱ्या युनिटमध्ये उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित समवृत्ती वक्र विश्लेषणाचा समावेश आहे. चौथ्या युनिटमध्ये उत्पादन फलन, एकूण, सरासरी व सीमांत उत्पादन, बदलत्या प्रमाणाचा नियम आणि प्रमाण फलाचा नियमाचा समावेश आहे. पाचव्या युनिटमध्ये उत्पादन खर्च सरासरी व सीमांत खर्च आणि खर्चवक्र, ण आणि ङ आकाराचे खर्च वक्र, अंतरगत आणि बाह्य मितव्ययता व अमितव्ययता या घटकांचा समावेश आहे. सहाव्या युनिटमध्ये पूर्णस्पर्धा, उद्योग संस्था व उद्योगाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकात या मुद्द्यांची सखोल आणि विस्तृत मांडणी केली आहे. सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.

    325.00
    Add to cart
  • माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य

    भारतात वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इ. माध्यमं ही प्रभावी प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जातात. या तिनही प्रसारमाध्यमांचा विचार केला तर जागतिकीकरणाच्या या कालखंडात मुद्रित आणि श्राव्य माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. यात वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम आहे तर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी हे अनुक्रमे श्राव्य व दृकश्राव्य प्रसारमाध्यमं आहेत. विशेषतः आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांचा विचार केला तर चोवीस तास चालणार्‍या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी, व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांचा आवाका व वेग इतका प्रचंड आहे की, त्यांच्या स्पर्धेत वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम टिकणार नाही अशी एक भीती निर्माण झालेली होती. परंतु ही भीती फोल ठरली. वृत्तपत्रांनी ऑनलाईन रूप धारण केलेले आहे तर श्राव्य माध्यमे ही चोवीस तास याप्रमाणे प्रसारित होत आहे. म्हणजेच या माध्यमांमधून व्यवसायाची मोठी संधी निर्माण झालेली दिसते. परंतु या माध्यमामध्ये काम करावयाचे असेल तर या माध्यमांसाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र? व कोणती पथ्य पाळायची? यासाठी सदर पुस्तक मार्गदर्शकाची भूमिका बजावेल यात शंका नाही.

    Madhymasanthi Lekhan and Sanvad Kaushalya

    95.00
    Add to cart
  • माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्ये (भाग-2)

    आधुनिक समाजमाध्यमे ही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, ट्विटर, यूट्युब या आधुनिक समाज माध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृक्श्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केलेले नाही तर या माध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. सोशन मिडिया म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख व स्थान निर्माण केले. व्यक्तिकेंद्री असणार्‍या सोशल मिडियाने सामाजिक अभिव्यक्तीला रचनात्मक व प्रयोगशील बनवले. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. आशयाचे विविध पदर उलगडले. एवढेच नव्हे तर आभासी विश्वाला तसेच त्यावर नोंदवल्या जाणार्‍या मतांना वास्तवात दखल घेण्यास भाग पाडले. म्हणून मानवी संज्ञापन क्रांतितील सोशल मिडिया हा महत्वाचा टप्पा ठरतो.

    Madhyamasathi Lekhan V Sanvad Kaushalye (Bhag 2)

    155.00
    Add to cart