सिंचन प्रक्रिया उद्योग व बाजार पेठ
Irrigation Process Industry and Market Growth
Dr Rameshwar BiseRs.130.00
भारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे.
पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. सोबतच अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. अध्ययनासाठी बुलडाणा जिल्ह्याची निवड केली, कारण महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असणार्या विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा विविध अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. माँ जिजाऊंचे जन्मस्थान, जग प्रसिद्ध लोणार सरोवर, थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्ह्याचा काही भाग आजही प्रसिद्ध आहे. अशा जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. जेणे करून त्याची तुलना विदर्भ व महाराष्ट्राशी करता येईल. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे. असे असले तरी अध्ययनाचा आणि मांडणीचा प्रयत्न त्रुटीरहीत नाही याची जाणीव आहे. वाचकांनी त्रुटी व सदोषता निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती आहे.
Sinchan Prakriya Udyog V Bajar Peth
- कृषी क्षेत्रात पाण्याचे महत्त्व
- सिंचनातून कृषी विकास
- पाणलोट आणि कृषी विकास
- शेतीविषयक करार
- कृषीमालाची विक्री
- पर्जन्यमानाचे अध्ययन
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.